योग्य इतिहास शिकवला असता तर औरंगजेब एकाही मुसलमानाचा हिरो नसता! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- ७५ हजार हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूची शिवरायांशी बरोबरी खपवून घेणार नाही


मुंबई : "देशाचा खरा इतिहास ७० वर्षे जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आला. जर योग्य वेळी नीट आणि वस्तुनिष्ठ इतिहास शिकवला गेला असता, तर आज या देशातील एकाही मुसलमानाने क्रूरकर्मा औरंगजेबाला आपला 'हिरो' मानले नसते," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) विधानसभेत विरोधकांवर प्रहार केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी इतिहासाच्या विकृतीकरणाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीवर निशाणा साधला.


आमदार विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या टिपू सुलतानच्या मुद्द्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, टिपू सुलतान चांगले होते की, वाईट यावर आमचा आक्षेप नाही. पण ज्यावेळी टिपू सुलतान हे छत्रपती शिवरायांऐवढे मोठे राजे होते, असे कुणीतरी म्हणतो, त्याला आमचा आक्षेप आहे. दुर्दैवाने, या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली, त्यात वर्षानुवर्षे आम्हाला टिपू सुलतान हे महान राजे होते हेच शिकवण्यात आले. पण ७५ हजार हिंदूंची आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारेही टिपू सुलतानच होते, हे आम्हाला कधीच शिकवले नाही. आता खरा इतिहास सापडतो आहे.





या देशात सरकारने ७० वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकात मुघल साम्राज्याला १७ पाने दिली आणि छत्रपती शिवरायांना एक परिच्छेद दिला. आता मोदी सरकारने एनसीईआरटीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला २० पाने दिली. योग्यवेळी नीट इतिहास शिकवला असता तर या देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपाला हिरो म्हटले नसते. पण आपण खरा इतिहास कधी शिकवलाच नाही. या देशात अनेक राष्ट्रभक्त मुस्लीम आहेत आणि त्यांच्याबद्दल आमचा कुठलाच आक्षेप नाही. जे लोक देशाच्या विरोधातील लोकांना आपला हिरो म्हणतील त्यांच्याविरुद्ध आम्ही लढाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- हिंदी सक्तीच्या निर्णयावर सही उद्धव ठाकरेंची मुंबई : "महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदी सक्तीबाबत निर्णय