Budget Session : डहाणूतील 'त्या' प्रकरणावर विधानपरिषदेत पडसाद; दोषी डॉक्टरांचे निलंबन

- आरोग्य केंद्रात बायोमेट्रिक सक्तीचे होणार!


मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या अनुपस्थितीत परिचारिकेने प्रसूती केल्याच्या गंभीर प्रकरणाचे पडसाद आज (२६ फेब्रुवारी) विधानपरिषदेत उमटले. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, महिला व बालविकास मंत्री मेघना बोर्डीकर यांनी संबंधित दोषी आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली.


चित्रा वाघ यांनी चर्चेला सुरुवात करताना आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले. "योजना आहेत, निधी आहे, मग शेवटच्या टप्प्यावर महिलांना सुविधा का मिळत नाहीत?" असा सवाल त्यांनी केला. डहाणूच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील आरोग्य केंद्रांच्या सखोल पुनरावलोकनाची मागणी केली. तसेच, दुर्गम भागात डॉक्टरांनी सेवा द्यावी यासाठी शासनाचे काय धोरण आहे आणि बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करणार का, असे रोखठोक प्रश्न त्यांनी विचारले.


यावर आमदार चित्रा वाघ यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, डहाणूतील घटना अत्यंत खेदजनक असून शासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित आरोग्य अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्यात आले आहे, तर कंत्राटी तत्त्वावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांची सेवा खंडित (Termination) करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आता बायोमेट्रिक प्रणाली सक्तीची करण्यात आली असून, याद्वारे नियमित संनियंत्रण (Monitoring) केले जात आहे. 'आयुष्मान भारत' आणि 'लक्ष्य' (LaQshya) कार्यक्रमांतर्गत राज्यातील लेबर रूम आणि प्रसूती कक्षांच्या गुणवत्तेवर भर दिला जात आहे. पालघरमधील ४६ पैकी १२ आरोग्य केंद्रे राष्ट्रीय स्तरावर प्रमाणित झाली असून, उर्वरित केंद्रेही या वर्षात सुधारली जातील, असे त्यांनी आश्वासित केले.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची