ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही नववा क्रमांक पटकावत सलग दुसऱ्या वर्षी आपले स्थान कायम राखले आहे. सामान्य नागरिकांना ऑनलाइन सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, प्रशासनात पारदर्शकता वाढवणे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे या निकषांवर पालिकेचे मूल्यमापन करण्यात आले.

पुणे येथील पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन (पीआरओ) या संस्थेने राज्यातील २९ महानगरपालिकांचा ई-गव्हर्नन्स निर्देशांक तपासला. सेवा उपलब्धता, प्रशासनातील पारदर्शकता, संकेतस्थळाची उपलब्धता, मोबाईल अॅप, तसेच समाजमाध्यमांचा वापर अशा विविध बाबींचा या सर्वेक्षणात समावेश होता. या सर्व निकषांवर वसई–विरार महानगरपालिकेने ६.४४ गुण मिळवत नववे स्थान मिळवले आहे.

पालिकेने ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करत स्वतःचे स्वतंत्र संकेतस्थळ, मोबाईल अॅप आणि समाजमाध्यमांवरील अधिकृत खाती कार्यान्वित केली आहेत. यामुळे नागरिकांना काही मिनिटांत माहिती मिळणे, तक्रारी नोंदवणे, करभरणा करणे तसेच विविध नागरी सेवांचा लाभ घेणे सुलभ झाले आहे. कोरोना काळानंतर ऑनलाइन सेवा वितरणाचे महत्त्व वाढले असून, शासनाने ई-गव्हर्नन्सला आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक मानले आहे.

विशेष म्हणजे, संकेतस्थळाचा वापर, समाजमाध्यमांवरील सक्रियता आणि पारदर्शकता या विभागांत वसई–विरार महानगरपालिकेला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. सलग दोन वर्षे नवव्या क्रमांकावर कायम राहिल्याने पालिकेच्या डिजिटल प्रशासनाची दखल घेतली जात असून, आगामी काळात या क्रमांकात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

नोराच्या 'सरके चुनर'वर कंगना रणौत यांची परखड टीका; हे गाणे सर्व मर्यादा ओलांडत...

मुंबई: रॅपर बादशाहच्या 'तेत्तिरी' गाण्यानंतर आता नोरा फतेही आणि संजय दत्त यांचे 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणे वादात

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक