Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत गांभीर्याने चर्चा झाली. शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी वांद्रे पूर्व येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे काम करताना प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे (Dust Mitigation Norms) उल्लंघन होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.



पंकजा मुंडे यांचे उत्तर: 'चुकीची आकडेवारी पसरवू नका'


या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, मुंबईत सध्या मेट्रो आणि विविध इमारतींची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डेब्रिज (बांधकाम कचरा) निर्माण होत आहे. येत्या ३ ते ६ महिन्यांत डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी बैठक घेऊन एक ठोस प्लॅन तयार केला जाईल. त्यांनी नमूद केले की, काही लोक विकासाला विरोध करण्यासाठी प्रदूषणाची चुकीची आकडेवारी सादर करत आहेत. नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी MPCB ची अधिकृत आकडेवारी पाहावी. भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी सांगितले की, "मी स्वतः कोस्टल हायवेवरून जात असताना धुळीचे लोट पाहिले आणि तिथे तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत."


या चर्चेत हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेला (BMC) IoT (Internet of Things) आणि AI (Artificial Intelligence) वर आधारित 'डायनॅमिक मॉनिटरिंग सिस्टीम' तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत मानवी हस्तक्षेपाऐवजी तंत्रज्ञानाचा वापर होत नाही, तोपर्यंत बांधकामांच्या ठिकाणचे १०० टक्के मॉनिटरिंग शक्य नाही. सरकारी असो वा खाजगी, प्रत्येक बांधकामावर या सिस्टीमद्वारे लक्ष ठेवले जाईल.

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त