तीन वर्षांनंतर प्रथमच स्वीकारणार स्थायी समिती अध्यक्ष स्वीकारणार महापालिका अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प येत्या बुधवारी मांडला जाणार असून तब्बल तीन वर्षांनतर महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हे अर्थसंकल्प स्वीकारणार आहेत. प्रशासक कालावधीमध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्यावतीने प्रशासक असलेल्या आयुक्तांना अर्थसंकल्प सादर केला जात असे. परंतु आता महापालिका स्थापन होवून स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे आयुक्तांकडून तीन वर्षानंतर स्थायी समिती अध्यक्ष हे अर्थसंकल्प स्वीकारणार आहेत.


मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी स्थायी समितीमध्ये सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी हे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना उपायुक्त (शिक्षण) डॉ प्राची जांभेकर शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.


मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. त्यापूर्वी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी इक्बालसिंह चहल यांनी तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर सन २०२३ पासून २०२५ पर्यंत सलग तीन वर्षे महापालिका प्रशासकांच्यावतीने अर्थसंकल्प मांडला जात आहे. अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांच्यावतीने प्रशासकांना अर्थसंकल्प सादर केला जात होता. त्यामुळे आता महापालिका अस्तित्वात आल्यामुळे आता तीन वर्षांनंतर प्रथमच शिक्षण समिती अध्यक्ष आणि स्थायी समिती अध्यक्ष यांना आयुक्तांच्यावतीने अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.


मागील अर्थसंकल्प हा ७४ हजार ४०० कोटी रुपयांचा होता. परंतु आता त्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्प मार्गी लागल्यामुळे आता या अर्थसंकल्पाचा आकार वाढला जावून तब्बल दहा हजार कोटींनी याचा आकार वाढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८४ ते ८५ हजार कोटी रुपयांच्या घरात महापालिका अर्थसंकल्पाचा आकार वाढला जाण्याची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

व्हॅल्युअर्सना मिळणार न्याय! महिनाभरात बँकांसोबत विशेष बैठक घेण्याची मंत्री पंकज भोयर यांची विधानपरिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यातील सुवर्णकार आणि बँकांमध्ये सोने तारण कर्ज प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'गोल्ड

‘तक्रार केल्यास काम अडवू’! सिंधुदुर्गमधील ठाकर बांधवांना अधिकाऱ्यांकडून दमदाटी - आमदार निलेश राणे विधानसभेत आक्रमक

भात खरेदीच्या थकबाकीवरूनही विचारला जाब मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाला जात पडताळणीसाठी ५००

पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ' पाणी फाउंडेशन' ने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. या फाउंडेशनने राज्य

एलपीजी पुरवठा सुरक्षित; काळाबाजार करणाऱ्यांवर राज्य सरकारचा 'सर्जिकल स्ट्राईक'

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य

मुंबई अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’

- उपग्रह छायाचित्रांद्वारे अतिक्रमणे शोधणार; म्हाडा, एसआरए आणि वन विभागाला दिले निर्देश मुंबई : मुंबईतील मोकळ्या

पागडी इमारतींमधील रहिवाशांच्या प्रश्नी सरकार सकारात्मक; राज्यमंत्री पंकज भोयर यांचे विधान परिषदेत ठोस उपाययोजनेचे आश्वासन

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि सुमारे १०० वर्षांहून जुन्या १३ हजार पागडी व सेस इमारतींमध्ये