मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर


बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन


मुंबई : इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याने हे राज्यासाठी मोठे यश असल्याचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून झालेल्या या भव्य गुंतवणुकीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.


विधानभवन, मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विधानपरिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सत्र पार पडले. या चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे विभागात झालेल्या गुंतवणुकीचा विशेष उल्लेख केला. दावोस येथील गुंतवणुकीची चर्चा नेहमीच होते; मात्र इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधून महाराष्ट्रासाठी झालेली ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही राज्याच्या आर्थिक विकासाला नवे बळ देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.


ऑक्टोबर २०२५ मध्ये गोरेगाव (नेस्को) येथे पार पडलेल्या इंडिया मेरिटाईम समिटमध्ये देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत बंदरे, जलपरिवहन, लॉजिस्टिक्स व किनारपट्टी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बंदरे खात्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची आणि गुंतवणुकीची दखल घेत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन केले.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने सज्ज आणि सक्षम