Buldhana News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; गावात संचारबंदी लागू

बुलढाणा : बुलढाणा मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा मधील चिखला काकड गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.



सरपंचासह २३ जणांना अटक :


महाराजांच्या पुतळ्याचा वाद हा गेल्या चार दिवसांपासून सुरू असून आता गावात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कारवाईही केली आहे. पोलिसांकडून गावच्या सरपंचासह २३ जणांना अटक करण्यात आली आहे.



नेमका वाद काय ?


छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस आधी गावातील एका मोकळ्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र, ही जागा गावातील विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी विशेषतः लग्नसमारंभासाठी वापरली जात असल्याने, हा पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले होते. तरीही पुतळा हलवण्यात न आल्याने वाद चिघळला.


नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. या घटनेत उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Comments
Add Comment

Minor Girl Abuse Case : धक्कादायक! कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; पित्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसून येत आहे.

NEET Paper Leak : मॉडर्न कॉलेजकडून मोठी कारवाई! प्राध्यापिका मनीषा मांढरे अखेर निलंबित

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला