अमरावती : कॉलेजचा निरोप समारंभ हा सगळ्यांसाठी खास असतो. हा दिवस कॉलेजमधील मज्जा मस्तीला पुन्हा उजाळा देण्याचा असतो. अशाच एका निरोप समारंभाच्या पार्टीत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं घडलं काय ?
पीडितेच्या तक्रारीनुसार २६ मे २०२५ रोजी रहाटगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये कॉलजेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या पार्टीचं आयोजन केलं होत. या पार्टीत चेतन आणि आकाश ते दोन विद्यार्थीही सहभागी झाले होते. चेतनने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील पीडित विद्यार्थिनीला या पार्टीसाठी बोलावलं होत. पार्टी सुरु असताना पीडितेच्या पेयात गुंगीचं औषध मिसळण्यात आलं. पेय प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपी चेतन अंबाडकर याने हॉटेलमधील एका खोलीत नेऊन पीडितेवर अत्याचार केला, असा आरोप करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह व्हिडीओ आणि ५ लाखांची मागणी
आरोपींच मन इतक्यातच भरली नाहीत या अमानुष कृत्यानंतर आरोपींनी त्या कृत्याचा व्हिडीओ आणि फोटो काढत हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या भीतीने तिच्यावर सतत अत्याचार केले. शिवाय आरोपींनी तिच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी देखील केली होती.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या छळाला कंटाळून अखेर पीडितेनं धाडस दाखवत' नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठत दोन्ही आरोपी भावांविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.