महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन

निवडणूक आयोगाचे २२ राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निर्देश


नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने देशव्यापी मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन (एसआयआर) जाहीर केले आहे. मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन प्रक्रिया १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आता एसआयआर उर्वरित २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविली जाईल. या २३ राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने सर्व २३ राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून एसआयआरची तयारी सुरू करण्यास सांगितले आहे. एसआयआर १ एप्रिल २०२६ पासून सुरू होऊ शकते.


एसआयआरआधीच बिहारमध्ये राबविण्यात आला आहे. देशातील अंदमान व निकोबार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या एसआयआर सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाने १९५१ ते २००४ दरम्यान देशभरात आठ वेळा एसआयआर केले. आता २१ वर्षांनंतर एसआयआर केले जात आहे.



एसआयआर का केले जाते?


 मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन ही प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोग राबवते. यात प्रत्येक मतदाराची ओळख, वय, पत्ता आणि पात्रता पुन्हा तपासली जाते. बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन माहिती पडताळतात आणि मतदारांकडून माहितीपत्रक भरून घेतात. पडताळणीनंतर मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदी वगळल्या जातात तसेच नवीन पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जातात. याचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवणे हा असतो.

Comments
Add Comment

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी