भाजपा आमदाराची धडक कारवाई! पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती

- मुंबईच्या चारकोपमध्ये पान टपऱ्यांवर धाडी, अमली पदार्थांची जप्ती


मुंबई : भाजपा आमदाराकडून चारकोप परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. चारकोप विधानसभेचे भाजप आमदार योगेश सागर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये पान शॉप च्या नावाखाली चाललेल्या अमली पदार्थाच्या विक्रीचा गैरप्रकार पोलिसांसमोर आणला आहे. पान टपरीवर धाड टाकून त्यांनी त्या दुकानातील साहित्य जप्त केले.


गेल्या अनेक दिवसांपासून कांदिवली महावीर नगर सहा या परिसरात टपरीवर पान, सिगारेटच्या नावाखाली अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ विकले जात आहेत अशी माहिती आमदार योगेश यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन टपरीवर धाड टाकली.





यावेळी आमदार योगेश सागर यांच्यासोबत नगरसेवक बाळा तावडे, स्थानिक नगरसेविका लीना देहेरकर, हिमांशू पारेख माजी नगरसेविका प्रतिभा गिरकर तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी एकाच वेळी महावीर नगर परिसरातील अनेक पान टपरीवर धाड मारली.

Comments
Add Comment

‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषी क्षेत्राशी सांगड घालावी, राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन मुंबई : पर्यावरण

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार

मुंबई मोनोरेलच्या नवीन रेक (Rolling Stock) व सीबीटीसी -आधारित सिग्नलिंग प्रणालीस सुरक्षा प्रमाणन प्राप्त

मुंबई :  मुंबई मोनोरेलच्या नवीन रेक (RST) तसेच सीबीटीसी-आधारित सिग्नलिंग प्रणालीस स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता

समुद्रमार्गाने गाठा कोकणाची वाट; मुंबई–विजयदुर्ग रो रो फेरी १ मार्चपासून सेवेत; जाणून घ्या वेळ आणि तिकीट

मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी समुद्रमार्गाचा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे. मुंबई ते विजयदुर्ग

२१ फेब्रुवारीलाच का साजरा करतात जागतिक मातृभाषा दिन? जाणून घ्या इतिहास

मुंबई : भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक मातृभाषा

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी २५ फेब्रुवारीला

मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारी रोजी पर्यंत मांडला न गेल्याने आता स्थायी समिती