Nitesh Rane : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये मंत्री नितेश राणे यांचा सहभाग

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल इंडिया'ला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी केंद्राने कंबर कसली आहे. नवी दिल्लीतील भव्य 'भारत मंडपम' येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये शुक्रवारी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत या तंत्रज्ञान क्रांतीचा आढावा घेतला. तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत जागतिक नकाशावर कसा आघाडीवर राहील, यावर या समिटमध्ये विशेष मंथन करण्यात आले.



या शिखर परिषदेविषयी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आज तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. ही समिट म्हणजे केवळ एक चर्चासत्र नसून, भविष्यातील भारताचा तांत्रिक नकाशा (रोडमॅप) आहे. एआयच्या माध्यमातून सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणे आणि भारताला जागतिक एआय हब बनवणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे."


या परिषदेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संबोधित केले. "डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताने आधीच मजबूत पाया तयार केला आहे. आता 'इंडिया एआय समिट'च्या माध्यमातून आपण जगाला दिशा देण्याचे काम करत आहोत," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या समिटमध्ये तंत्रज्ञानासोबतच एआयच्या नैतिक वापरासावरही सखोल चर्चा झाली. डेटा सुरक्षा, सायबर सुरक्षितता आणि तरुणांच्या कौशल्य विकासासाठी एआयचा वापर कसा करता येईल, यावर विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. मंत्री नितेश राणे यांनी यावेळी विविध देशांच्या तांत्रिक धोरणांचा आणि भविष्यातील संधींचा सखोल आढावा घेतला.

Comments
Add Comment

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये