'रिपाइं'च्या मुंबईतील सर्व तालुका, वॉर्ड समित्या बरखास्त - केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा निर्णय; ५ एप्रिलपर्यंत संघटनात्मक निवडणुका घेण्याचे आदेश

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपटाचा रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) मुंबईतील आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व तालुका आणि वॉर्ड कमिट्या तातडीने बरखास्त करण्यात आल्या आहेत. येत्या ५ एप्रिलपर्यंत या सर्व स्तरांवर निवडणुका घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे आदेश आठवले यांनी दिले असल्याची माहिती पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी शुक्रवारी दिली.


आझाद मैदानातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कासारे बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्यासह मुंबई प्रदेशातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील पक्षसंघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि तरुण रक्ताला संधी देण्यासाठी हा व्यापक निर्णय घेण्यात आल्याचे कासारे यांनी स्पष्ट केले.


पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व वॉर्ड आणि तालुका अध्यक्षांची निवड लोकशाही मार्गाने म्हणजेच निवडणुकांद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून संपूर्ण मुंबईत विशेष पक्षसदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेत नोंदणी केलेल्या क्रियाशील सदस्यांनाच वॉर्ड आणि तालुका कमिटीच्या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. ५ एप्रिल ही या प्रक्रियेची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Ashish Shekar : महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडी आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारा

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश मुंबई (विशेष

Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :