'रिपाइं'च्या मुंबईतील सर्व तालुका, वॉर्ड समित्या बरखास्त - केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा निर्णय; ५ एप्रिलपर्यंत संघटनात्मक निवडणुका घेण्याचे आदेश

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपटाचा रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) मुंबईतील आपल्या संघटनात्मक रचनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील सर्व तालुका आणि वॉर्ड कमिट्या तातडीने बरखास्त करण्यात आल्या आहेत. येत्या ५ एप्रिलपर्यंत या सर्व स्तरांवर निवडणुका घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे आदेश आठवले यांनी दिले असल्याची माहिती पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी शुक्रवारी दिली.


आझाद मैदानातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कासारे बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्यासह मुंबई प्रदेशातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील पक्षसंघटनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि तरुण रक्ताला संधी देण्यासाठी हा व्यापक निर्णय घेण्यात आल्याचे कासारे यांनी स्पष्ट केले.


पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व वॉर्ड आणि तालुका अध्यक्षांची निवड लोकशाही मार्गाने म्हणजेच निवडणुकांद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी येत्या २५ फेब्रुवारीपासून संपूर्ण मुंबईत विशेष पक्षसदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात येईल. या मोहिमेत नोंदणी केलेल्या क्रियाशील सदस्यांनाच वॉर्ड आणि तालुका कमिटीच्या निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. ५ एप्रिल ही या प्रक्रियेची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी