Raj Thackeray Meet Eknath Shinde : माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला अन् आता भाऊही...; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोरात असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या 'नंदनवन' या निवासस्थानी भेट घेतली. या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. म्हात्रे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत उद्धव ठाकरेंच्या सद्यस्थितीवर उपरोधिक टिप्पणी केली आहे. "माझा पक्ष पळवला... माझा बाप पळवला... आता माझा भाऊ पळवला!!!" अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, आगामी काळात नव्या राजकीय समीकरणांची नांदी या भेटीतून पाहायला मिळू शकते, असे बोलले जात आहे.






...दोन वाघ एकत्र येत असतील तर आनंदच!!- नरेश म्हस्के




अशातच, या भेटीवर भाष्य करताना शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून काहींना पोटशूळ उठला असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. म्हस्के यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतून घडलेले कार्यकर्ते आहेत. जर हे दोन नेते हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येत असतील, तर ही सामान्य शिवसैनिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या विधानामुळे आता महायुती आणि मनसे यांच्यातील जवळीक अधिक स्पष्ट होत असल्याचे दिसून येत असून, आगामी काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवी युती आकारास येण्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये रंगणार चित्रपट महोत्सव

मुंबई: राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे

Goregaon News : गोरेगावात शोभायात्रेदरम्यान दोन गट भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज, ८ जणांना अटक

मुंबई : काल गोरेगाव पूर्व येथील संतोष नगर परिसरात शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये अचानक उसळलेल्या वादाने हिंसक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका