भोगवादी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : प्राचीन शिक्षणपद्धतीत मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिले जात होते. मात्र आधुनिक काळात भोगवादी प्रवृत्ती वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये माणूस घरात राहिल्याने नद्या स्वच्छ झाल्या, आकाश निर्मळ दिसू लागले. यावरून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यात मानवी हस्तक्षेपच प्रमुख कारण असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी स्पष्ट करत चिंता व्यक्त केली.


मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्थी, प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी, जलज दानी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

‘मुंबई क्लायमेट वीक’च्या तीन दिवसीय परिषदेच्या माध्यमातून हवामान बदलाच्या गंभीर प्रश्नावर देश-विदेशातील तज्ज्ञांनी चिंतन केल्याबद्दल राज्यपालांनी आयोजकांचे अभिनंदन केले. राज्यपाल श्री.देवव्रत म्हणाले की,कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहे, शिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्‍ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. प्राचीन शिक्षणपद्धतीत मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिले जात होते. मात्र आधुनिक काळात भोगवादी प्रवृत्ती वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे असेही नमूद केले.


पर्यावरण संरक्षणासाठी ठोस कृतीची गरज – मंत्री पंकजा मुंडे

पर्यावरण संरक्षणासाठी ठोस आणि व्यापक पातळीवर कृती करण्याचे आवाहन करत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भूतकाळात विकास आणि पायाभूत सुविधांवर भर देताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. पर्यावरणाचा प्रश्न हा एका प्रदेशापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करताना जागतिक दृष्टीकोन आवश्यक आहे.


हवामान लवचिकतेसाठी सार्वत्रिक प्रयत्न आवश्यक – महापौर रितु तावडे


शहराचा विकास, वाढ आणि हवामान जबाबदारी या एकमेकांपासून वेगळ्या न ठेवता समांतर आणि समन्वयाने पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे मुंबईच्या महापौर रितु तावडे यांनी सांगितले. हवामान लवचिकता केवळ शासनापुरती मर्यादित नसून सार्वजनिक संस्था, खाजगी उद्योग, वित्तीय भागीदार, संशोधन संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य होईल. यासाठी मजबूत सार्वजनिक-खाजगी भागीदारी, नवोन्मेषी वित्तपुरवठा, तांत्रिक सहकार्य आणि नागरिकांच्या वर्तनातील सकारात्मक बदल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

सांताक्रुझमध्ये सिलेंडर स्फोट, चार जखमी

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील सांताक्रुझ पश्चिम येथून एक धक्कादायक बातमी आली आहे. सांताक्रुझ पश्चिमेच्या

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी साधला अंतराळवीरांशी संवाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर (निवृत्त) राकेश शर्मा व भारताचे दुसरे अंतराळवीर

शिवजयंती उत्सव निमित्त मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित

मुंबईत स्थायी समितीवर प्रथमच भाजपचा अध्यक्ष

स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे हे शुक्रवारी होणार विराजमान भाजपचे तीन दशकांचे स्थायी समिती

महापालिका स्वच्छता कामगारांची विशेष कर्करोगाची तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे हजारो स्वच्छता कर्मचारी मुंबईचा

अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल ३० दिवसांत येणार

'ब्लॅक बॉक्स'मधील माहिती संकलित; 'सीव्हीआर'मधील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेची मदत घेणार मुंबई : बारामती येथे २८