Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा बदलणार; रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबत मंत्री श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली.



या बैठकीस वित्त विभागाचे अप्पर सचिव श्री.तानाजी पवार, कृषी विभागाचे श्री. चंदन शिवे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव श्री. सोमनाथ बागुल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे श्री. दीपक केंद्रे, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव श्री.ठाकूर, जलसंधारण विभागाचे सचिव श्री.गणेश पाटील,जलसंधारण विभागाचे सहसचिव श्री.संदीप जाधव यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


यावेळी मंत्री श्री.नितेश राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा व राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा जिल्हा आहे. तसेच राज्यातील पहिला AI युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळख मिळाली असून, नीती आयोगाने सिंधुदुर्गच्या AI मॉडेलची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्गमधील विविध आस्थापनांवरील वरिष्ठ व आवश्यक पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

अहमदाबादमध्ये भारताचा विजयी चौकार

शिवमचा झंझावात आणि चक्रवर्तीची फिरकी नेदरलँड्सवर १७ धावांनी मात अहमदाबाद  : अहमदाबादच्या मैदानावर भारतीय

शिवजयंतीच्या पर्वावर महसूलमंत्र्यांची महत्वाकांक्षी घोषणा

एका दिवसात निकाली काढणार पंधरा महसूल सेवा * 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर * राज्यातील सर्व मंडल,

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील कंत्राटदाला ५० लाखांचा दंड

दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूलाच्या कामांत दिरंगाई मुंबई (विशेष

कन्नमवार नाल्याची भिंत उभारण्याचा मार्ग मोकळा, ३९ बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी येथील कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे

मुंबईत भव्य प्रवेशव्दार व क्लॅाकटॅावर उभारा, महापौर रितू तावडे यांनी आयुक्तांना सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत

शिवम दुबेचे अर्धशतक, भारताने नेदरलँडला दिले एवढे मोठे आव्हान

अहमदाबाद : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरलेला भारत निव्वळ औपचारिकता म्हणून