राष्ट्रपतींनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूची पाहणी केली. ‘इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू, २०२६’ मध्ये ७० हून अधिक देशांची नौदले सहभागी झाली आहेत.


यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू हा सागरी परंपरांबद्दल विविध राष्ट्रांमधील एकता, विश्वास आणि आदर प्रतिबिंबित करतो. वेगवेगळे ध्वज असलेली जहाजे आणि विविध देशांचे खलाशी एकतेची भावना प्रदर्शित करतात. एकजुटीची ही भावना, 'युनायटेड थ्रू ओशन्स' या पुनरावलोकनाच्या संकल्पनेत मांडण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या सामूहिक नौदल सामर्थ्याची वचनबद्धता आणि निर्धार सर्व आव्हानांवर मात करू शकतो, हा जागतिक समुदायासाठी एक सकारात्मक संदेश आहे, असे त्या म्हणाल्या.


सागरी क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय संबंधांकडे पाहण्याचा भारताचा दृष्टीकोन 'वसुधैव कुटुंबकम' किंवा 'जग एक कुटुंब आहे' या मूल्यांवर आधारित आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. हा दृष्टीकोन असा व्यावहारिक विचार मांडतो की, भागीदारीतून जागतिक सुरक्षा आणि विकास, शाश्वतता आणि स्थैर्य निर्माण होते. भागीदारीची ही भावना शाश्वत जागतिक व्यवस्थेचा पाया आहे. भारताचा असा विश्वास आहे की एक मजबूत सागरी व्यवस्था, ही सामूहिक जबाबदारी आणि समविचारी भागीदारांमधील सहकार्यात्मक कृतीवर आधारित आहे. त्या म्हणाल्या की, हा फ्लीट रिव्ह्यू भारताच्या ‘महासागर’ हा दृष्टीकोन देखील पुढे नेत आहे, ज्याचा अर्थ संपूर्ण प्रदेशाची सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती, हा आहे, असे त्या म्हणाल्या.


राष्ट्रपतींनी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या परदेशी नौदलातील अधिकारी आणि खलाशांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की हे जवान त्यांची सेवा आणि त्यांच्या राष्ट्रांच्या सर्वोत्तम परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची शिस्त, समर्पण आणि क्षमता हा सामूहिक सागरी सुरक्षेचा पाया आहे. फ्लीट रिव्ह्यूमधील त्यांच्या उपस्थितीमुळे आपले विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत आणि महासागरातील शांतता, स्थैर्य आणि सहकार्याप्रति आपली सामायिक वचनबद्धता पुन्हा सिद्ध झाली आहे, असे त्या म्हणाल्या.


या फ्लीट रिव्ह्यूमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी सर्व नौदले एकत्रितपणे जागतिक समुदायाचा विकास, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाला चालना देणारा घटक म्हणून महासागरांची भरभराट करण्यात सहाय्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.