Nitesh Rane : ठाण्यातील 'मालवणी महोत्सवा'त मंत्री नितेश राणे यांची हजेरी; स्टॉलला भेट देऊन ग्राहकांशी साधला संवाद

ठाणे : ठाणे शहरात सध्या मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या 'मालवणी महोत्सवा'ला मंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावून महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सीताराम राणे यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान नितेश राणे यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर संपूर्ण महोत्सवात फिरून कोकणी कला आणि खाद्यसंस्कृतीची पाहणी केली.





मंत्री नितेश राणे यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांशी आणि विक्रेत्यांशी आपुलकीने चर्चा केली. कोकणी उत्पादने, मालवणी मसाले आणि खाद्यपदार्थांची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. नितेश राणे आणि सीताराम राणे यांचे महोत्सवाच्या ठिकाणी आगमन होताच त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महोत्सवात मोठी गर्दी पाहायला मिळाली. महोत्सवाच्या मुख्य स्टेजवर नितेश राणे यांचे आयोजन समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी संयोजकांनी त्यांचे आभार मानले आणि महोत्सवाचा गौरव वाढवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नितेश राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधताना मालवणी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले. ठाणेकरांनी या महोत्सवाला दिलेला प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.



या महोत्सवात मालवणी खाद्यपदार्थ, कोकणातील हस्तकला आणि पारंपारिक वस्तूंनी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भेटीमुळे महोत्सवात एक वेगळाच उत्साह संचारला होता, तसेच नागरिकांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

IIT मुंबई काडतूस प्रकरण : मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त; राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत माहिती

पुरवठादारासह विक्रेत्यालाही ठोकल्या बेड्या मुंबई : देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी (IIT) पवई

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज