Nitesh Rane : ठाण्यातील 'मालवणी महोत्सवा'त मंत्री नितेश राणे यांची हजेरी; स्टॉलला भेट देऊन ग्राहकांशी साधला संवाद

ठाणे : ठाणे शहरात सध्या मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या 'मालवणी महोत्सवा'ला मंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावून महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सीताराम राणे यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान नितेश राणे यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर संपूर्ण महोत्सवात फिरून कोकणी कला आणि खाद्यसंस्कृतीची पाहणी केली.





मंत्री नितेश राणे यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांशी आणि विक्रेत्यांशी आपुलकीने चर्चा केली. कोकणी उत्पादने, मालवणी मसाले आणि खाद्यपदार्थांची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. नितेश राणे आणि सीताराम राणे यांचे महोत्सवाच्या ठिकाणी आगमन होताच त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महोत्सवात मोठी गर्दी पाहायला मिळाली. महोत्सवाच्या मुख्य स्टेजवर नितेश राणे यांचे आयोजन समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी संयोजकांनी त्यांचे आभार मानले आणि महोत्सवाचा गौरव वाढवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नितेश राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधताना मालवणी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले. ठाणेकरांनी या महोत्सवाला दिलेला प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.



या महोत्सवात मालवणी खाद्यपदार्थ, कोकणातील हस्तकला आणि पारंपारिक वस्तूंनी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भेटीमुळे महोत्सवात एक वेगळाच उत्साह संचारला होता, तसेच नागरिकांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Comments
Add Comment

Raj Thackeray Eknath Shinde : राज ठाकरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, नव्या हालचालींना वेग...

मुंबई : राज्याच्या राजकारणातील दोन महत्त्वाचे नेते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

मुंबई: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील दोन लाख

शिवरायांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणमध्ये अध्यासन केंद्र - मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; शासनाकडून विशेष निधी मंजूर

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

मुंबई: राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने

व्हीएसआर' कंपनीला वाचवण्यासाठी मिलीभगत?  - रोहित पवार यांचा गंभीर आरोप; केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा नवे

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकमध्ये पर्यावरण विभागाचे दोन महत्त्वाचे सामंजस्य करार

मुंबई: हवामान बदलाचा मुकाबला आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व