राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे
पुणे : माझा भाऊ नाही. माझा दादा इतक्या मोकळ्या मनाचा होता, ते ऑफ दि रेकॉर्ड पत्रकारांशी सुद्धा बोलले आहेत. त्यामुळे या विषयावर मी काय बोलू? ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहिलं. आता कुणासोबत काय खोटं करायचं, जे खरं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आता कशी कुणाची उणीदुणी काढायची. कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श्रद्धांजली असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही कधी स्वतःसाठी राजकारण केलं नाही. आम्ही या देशाचे, राज्याचे सेवक आहोत. लोकांनी आम्हाला निवडून दिले. आमचं ऑबजेक्टिव्ह काय आहे तर लोकांची काम करावीत. मतदारसंघाचा विकास करावा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं
याप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे.याप्रकरणी आम्हाला राजकारण करायचंच नाही. आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला. हा राजकारणाचा विषयच नाही. दादा गेल्याने आम्ही सर्वच भावनिक आहोत. जगात माणुसकी उरली आहे की नाही. दादा गेल्यावर अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही आता पुढे पाहतोय. या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे हा एक भाग आणि दुसऱ्या भागात देशासमोरील आव्हानं, काम पूर्ण करणं अशा दोन्ही ठिकाणी आम्ही कारत आहोत,तर स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांना साथ देणार,असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,रोहितची अस्वस्थता ही सहाजिक आहे. अशी मोठी घटना घडते तेव्हा अस्वस्थ वाटणे हे सहाजिक आहे. रोहित हे सातत्याने ती उत्तरं शोधत आहे. आमच्या घरात जे झालं, ते कुणाच्याही घरात होऊ नये हाच यामागचा विचार आहे. चौकशी ही पारदर्शक व्हायला पाहिजे ही तमाम महाराष्ट्राची मागणी आहे. अभ्यासपूर्वक फॉलोअप रोहित करत आहेत. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल असे मला वाटते. ब्लॅक बॉक्सबाबत तांत्रिक माहिती मिळेलच याबाबत मला शंका नाही, असेही सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही एकत्र असू. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यात पुढील निर्णय होईल, माझं पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालं आहे, पीडित कुटुंबीयांस न्याय भेटला पाहिजे, तिथं शांतता राहिली पाहिजे, तसेच, हा विषय वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,महाराष्ट्रात नवीन ट्रॅन्ड झालाय, आमचं म्हणणं आहे हिंसा होऊ नये,असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.