स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध?

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून या चारही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज भरले जाणार असल्याने भाजपा आणि शिवसेनेकडून उमेदवारी जाहिर होवून अध्यक्षपदाचे खरे चेहरे समोर येणार आहेत. दरम्यान, महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणुकीत उमेदवार न देता उबाठाने ही निवडणूक बिनविरोध केल्यानंतर या चारही समित्यांमध्ये उबाठाकडून उमेदवार देण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. त्यामुळे उबाठाने उमेदवार न दिल्यास ही निवडणूकही बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती, अध्यक्षपदासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे, तर सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या चारही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत.


स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदे यांचे नाव जवळजवळ अंतिम झाले आहे. तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर यांची नावही निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. तर सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अमेय घोले आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी तृष्णा विश्वासराव यांचीही नावे अंतिम झाली आहेत. परंतु विरोधी पक्षांकडून या चारही समित्यांवर सदस्यांची नियुक्ती झाली असली तरी त्यातील कुणाला उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ज्या कारणांसाठी उबाठाने माघार घेत उमेदवार दिला नव्हता, तेच कारण आता चारही वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उबाठासमोर आहे. त्यामुळे चारही वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज न भरता ही निवडणूक बिनविरोध केली जाण्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बुधवारी उबाठाकडून प्रत्यक्षात उमेदवार दिला जातो की महापौर निवडणुकीप्रमाणे बिनविरोध केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे सर्व समित्यांमध्ये सत्ताधार पक्षांचे संख्याबळ हे विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या तुलनेत दोनने अधिक आहे.त्यामुळे निवडणूक काँटे की टक्कर नसल्याने उबाठाला प्रत्यक्षात मतदानाची भीती असून जर मनसे आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा न दिल्यास किंवा काँग्रेस तटस्थ राहिल्यास आपला गेम होईल याची भीती वाटत आहे.

Comments
Add Comment

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात

सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये नियमावलीवरून जुंपली

संविधानातील कलमाचा दाखला देत नार्वेकरांनी फटकारले; खासगी विधेयकावरून विधानसभेत खडाजंगी मुंबई : सरकारी

'टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्या'

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई : टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि.

राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत विकासाला प्राधान्य

मुंबई : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी

'पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय होणार नाही'

मुंबई :  पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांची नियुक्ती ही गुणवत्तेवर होत असून उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय

मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती