मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत प्रवेश करताना पर्यटकांना मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी मुंबईतील चारही प्रवेशद्वारावर भव्य प्रवेशद्वार व क्लॅाकटॅावर उभारण्याची तरतूद यावर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशी मागणी वजा निर्देश महापौर रितू तावडे यांनी एका पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग, मुलुंड चेक नाका, मुलुंड ऐरोली मार्ग, वाशी मानखुर्द मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग दहिसर चेक नाका येथे सौंदर्यीकरण, सुशोभीकरण व क्लॅाक टॉवर उभारण्यात यावा. जेणेकरून जागतिक स्तरावर मुंबईची ओळख निर्माण होईल असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.