Nashik: नाशिक-कळवण मार्गावर दोन कारची धडक; सात जण गंभीर जखमी

नाशिक: सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी वणीगडाकडे जाणाऱ्या भाविकांच्या कारला नाशिक-कळवण मार्गावर भीषण अपघाताचा सामना करावा लागला आहे. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांतील ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.


हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाड्यांमध्ये अडकलेल्या जखमींना नागरिकांनी मोठ्या शर्थीने बाहेर काढले.


जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भररस्त्यात दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने नाशिक-कळवण मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.


सध्या वणीगडावर भाविकांची मोठी गर्दी होत असून, घाटातील आणि महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. अशा वेळी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वळणांवर सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला

श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली

अल्पवयीन मुलीचं शोषण करत धर्मांतरासाठी दबाव, भिवंडीतील संतापजनक प्रकार समोर

भिवंडी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि तिला आंतरधर्मीय

युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका

मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा