Harshvardhan Sapkal : मी तुलना केलीच नव्हती मात्र...अखेर शिवरायांच्या अपमानावरून हर्षवर्धन सपकाळांची माफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या धाडसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना अखेर नमते घ्यावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या राज्यव्यापी एल्गारानंतर आणि शिवप्रेमींच्या तीव्र आंदोलनासमोर सपकाळ यांनी हात जोडत आपली दिलगिरी व्यक्त केली. "ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांच्याप्रती मी दिलगिरी व्यक्त करतो," असे म्हणत सपकाळ यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.



भाजपचा आक्रमक पवित्रा आणि सपकाळांची सारवासारव


काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. टिपू सुलतानसारख्या वादग्रस्त व्यक्तीचा आदर्श छत्रपती शिवरायांशी जोडणे, हा केवळ महाराजांचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवर केलेला घाला आहे, अशी भूमिका भाजपने मांडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आणि इतर शहरांत रस्त्यावर उतरून सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. या वाढत्या दबावामुळे सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले की, "मी तुलना केलीच नव्हती, माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला." मात्र, भाजपने याला काँग्रेसची नेहमीची 'यु-टर्न' घेण्याची पद्धत म्हटले आहे.



"टिपू सुलतानांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही"


सपकाळ यांनी आपल्या स्पष्टीकरणात टिपू सुलतानांचा उल्लेख संविधानातील प्रतिमेचा दाखला देत केला आणि त्यांना शिवरायांकडून प्रेरणा घेणारे म्हटले. यावर भाजप नेत्यांनी पलटवार केला आहे. "हिंदूंचे दमन करणाऱ्या टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करण्यासाठी शिवरायांच्या नावाचा आधार घेणे हे काँग्रेसचे दिवाळखोर वैचारिक धोरण आहे," अशी टीका भाजपकडून करण्यात आली. धर्मांतराचे आणि अत्याचाराचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीची तुलना स्वराज्याच्या संस्थापकांशी करणे ही शिवद्रोहाचीच कृती असल्याचे भाजपने ठामपणे सांगितले.



धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव?


सपकाळ यांनी उलट भाजपवरच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला असला, तरी भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. "लोकांच्या भावना भडकवणारी वक्तव्ये काँग्रेसचे नेते करतात आणि जेव्हा जनता जाब विचारते, तेव्हा भाजपवर खापर फोडतात," असा टोला भाजप प्रवक्त्यांनी लगावला. अखेर जनरेटा आणि शिवप्रेमींचा रोष पाहता सपकाळ यांना माफी मागावी लागली, हा भाजपच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि शिवरायांच्या सन्मानाचा विजय असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र

Unauthorized Schools : मुंबईतील १६४ अनधिकृत शाळा नोटीस देवूनही सुरुच , संस्थाचालकांवर कारवाई करा

शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले तीव्र पडसाद मुंबई : मुंबईतील अनधिकृत ठरलेल्या १६४ शाळांपैंकी ६५ शाळा या केवळ

KEM Hospital : केईएम रुग्णालयात रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न... सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांनी घटनास्थळी केली पाहणी

मुंबई : महानगरपालिकेच्या के.ई.एम. हॉस्पिटल येथे शुक्रवारी सकाळी घटनेत घटनेत 27 वर्षीय एका रुग्णाने आत्महत्येचा

Dialysis facility : पश्चिम उनगरातील ३ आणि पूर्व उपनगरातील २ रुग्णालयात डायलेसिसची सुविधा

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येत असून