Solar Eclipse: १७ फेब्रुवारीला वर्षातील पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि दिवसभरात कोणत्या चूका टाळाव्यात?

मुंबई: खगोलशास्त्र आणि धार्मिक परंपरांमध्ये रस असणाऱ्यांसाठी २०२६ हे वर्ष विशेष महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असून, खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हे सूर्यग्रहण होणार असून, ते माघ अमावस्येच्या दिवशीच पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे, ज्यामुळे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातूनही या घटनेला मोठं महत्त्व आहे.



ग्रहणाची वेळ आणि स्वरूप


पंचांगानुसार, सूर्यग्रहणाची सुरुवात दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी होईल, तर सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत हे ग्रहण चालू राहील. खगोलतज्ज्ञांच्या माहितीनुसार, हे ग्रहण अंटार्क्टिका, आफ्रिकेतील काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या परिसरात स्पष्टपणे दिसणार आहे. परंतु भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने देशात सुतक काळ लागू होणार नाही.


आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी ज्योतिषीय मान्यतेनुसार, ग्रहण काळात आरोग्य व आर्थिक विषयांमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक मानलं जातं. या काळात निष्काळजीपणा केल्यास शारीरिक त्रास किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक निर्णय, गुंतवणूक किंवा व्यवहार करण्यापूर्वी सखोल विचार करणं हिताचं ठरतं. घरातील ज्येष्ठांचा सल्ला न घेता किंवा परिस्थितीचा अंदाज न बांधता निर्णय घेणं टाळावं.



ग्रहण काळात काय करावं?


धार्मिक परंपरांनुसार, ग्रहण काळात मंत्रजप करणं शुभ मानलं जातं. सूर्य मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मानसिक शांतता मिळते, असं मानलं जातं. सकारात्मक विचार ठेवणं, ध्यानधारणा करणं आणि शांततेत वेळ घालवणं या काळात लाभदायक ठरू शकतं. ग्रहण संपल्यानंतर स्नान करणं आणि दानधर्म करणंही शुभ समजलं जातं.



काय टाळावं?


ग्रहण काळात स्वयंपाक करणं किंवा अन्नपदार्थांचं सेवन करणं टाळण्याची प्रथा आहे. तसेच वादविवाद, नकारात्मक चर्चा आणि तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे. कोणतेही मोठे निर्णय, करार किंवा नवीन कामाची सुरुवात या काळात टाळावी. तसेच गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी विशेष खबरदारी घेणं गरजेचं मानलं जातं. या काळात तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरणं टाळावं, तसेच अनावश्यक श्रम करू नयेत. मानसिक शांतता राखणं आणि सकारात्मक वातावरणात राहणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या