अंदमान निकोबारमध्ये शिवजयंती महोत्सवाचे आयोजन; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार  

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा १९ फेब्रुवारी रोजी ३९६ वी जयंती आहे. यंदा ३९६ वा शिवजयंती महोत्सव अंदमान निकोबार येथील पोर्टब्लेअर या ऐतिहासीक बेटावर साजरा होणार आहे. अंदमान निकोबार मधील शिवजयंती महोत्सवास रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. यंदाचा शिवजयंती महोत्सव आपण अंदमान निकोबार या ऐतिहासीक केंद्रशासीत प्रदेशात साजरा करणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.


भारतीय स्वातंत्र्य लढयात अंदमान निकोबारचे ऐतिहासीक महत्व आहे. अंदमान निकोबार येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा झाली होती. अंदमान निकोबार येथील तुरंगात ब्रिटीशांनी पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र सैनिकांना डांबुन ठेवले जात होते. अंदमान निकोबार येथे भारतीय स्वांतत्र लढयाच्या अनेक ऐतिहासीक खुणा आहेत. या ऐतिहासीक अंदमान निकोबारच्या पोर्टब्लेअर येथील मराठी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यास ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात