Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. देशाला “विकसित भारत” बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्राने नवोन्मेष, क्षमता वाढ आणि जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी धाडसी गुंतवणूक करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


रविवार १५ फेब्रुवारी रोजी माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने ‘शब्दांमध्ये आणि भावनेतही’ सुधारणा (रिफॉर्म) यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मते, धोरणातील सातत्य आणि निर्णायक नेतृत्वामुळे देशात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. त्यांनी म्हटले की, उत्पादकता वाढल्यावर खासगी क्षेत्रातील मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर नफा न्याय्य पद्धतीने वाटून घ्यावा. तसेच उद्योगांनी कमी नफा सुरक्षित ठेवण्यावर भर न देता संशोधन व विकास (R&D), पुरवठा साखळी आणि गुणवत्तेत अधिक गुंतवणूक करावी.



डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल:


मोदी पुढे म्हणाले की; भारताचे मुक्त व्यापार करार (FTA) अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की टेक्सटाईल, लेदर, केमिकल्स, हस्तकला आणि रत्न यांसारख्या क्षेत्रातील एमएसएमई उद्योगांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. त्यांनी म्हटले की भारत आज डिजिटल क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. व्यवहार करण्याच्या पद्धतीत झालेल्या मोठ्या बदलांमुळे, विशेषतः युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) प्लॅटफॉर्ममुळे हे शक्य झाले आहे.


त्यांनी पुढे सांगितले की डेटा सेंटर्समुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. भारत जगभरातील डेटा साठवण्यासाठी तयार आहे. तसेच देशात संगणकीय क्षमता आणि डेटा सेंटर पायाभूत सुविधा वाढवून मजबूत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) परिसंस्थेची पायाभरणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न:


संरक्षण क्षेत्राबाबत पंतप्रधानांनी सांगितले की बदलत्या परिस्थितीनुसार सैन्याचे आधुनिकीकरण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि देशाची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की राजकीय स्थिरता आणि धोरणात्मक स्पष्टतेमुळे गुंतवणूकदारांचा भारतावर पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या सरकारचा प्रत्येक निर्णय महिलांच्या कल्याणाचा विचार करून घेतला जातो आणि ‘विकसित भारत’ घडवण्यात महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

Comments
Add Comment

Ketan Agarwal Murder : एवढा मोठा कांड केला तरी पश्चात्ताप नाही ; त्यात लॉकअपमध्ये सियाने अशी काही मागणी केली की पोलीसही झाले थक्क

Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर पती केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला शेकडो फूट खोल दरीत ढकलून ठार मारल्याच्या आरोपामुळे सध्या

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद सहा जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार कायमस्वरूपी नोंद

Operation Sindoor :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन

Raincore Trend : ओले रस्ते, स्टायलिश अंदाज : पावसाळी फॅशनमध्ये 'रेनकोर'चा डंका!

सध्या फॅशन विश्वात 'रेनकोर' (Raincore) या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेंड केवळ पावसाळी हवामानापासून

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्या राम मंदिर दान घोटाळा प्रकरणात नवे वळण; चंपत राय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा

अयोध्या राम मंदिर दान घोटाळा (Ayodhya Ram Mandir Donation Scam) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र

Amarnath Yatra 2026 Guide: हर हर महादेव! अमरनाथ यात्रेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

श्रीनगर : दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाच्या

Jharkhand Road Accident News : रामगडमध्ये ट्रकची प्रवासी वाहनाला भीषण धडक; ७ जणांचा मृत्यू

झारखंड : झारखंडमधील रामगड (Ramgarh) जिल्ह्यातील रजरप्पा पोलीस ठाणे (Rajrappa Police Station) हद्दीतील लारी-बरलौंग परिसरात गुरुवारी