Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. देशाला “विकसित भारत” बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्राने नवोन्मेष, क्षमता वाढ आणि जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी धाडसी गुंतवणूक करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


रविवार १५ फेब्रुवारी रोजी माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने ‘शब्दांमध्ये आणि भावनेतही’ सुधारणा (रिफॉर्म) यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मते, धोरणातील सातत्य आणि निर्णायक नेतृत्वामुळे देशात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. त्यांनी म्हटले की, उत्पादकता वाढल्यावर खासगी क्षेत्रातील मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर नफा न्याय्य पद्धतीने वाटून घ्यावा. तसेच उद्योगांनी कमी नफा सुरक्षित ठेवण्यावर भर न देता संशोधन व विकास (R&D), पुरवठा साखळी आणि गुणवत्तेत अधिक गुंतवणूक करावी.



डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल:


मोदी पुढे म्हणाले की; भारताचे मुक्त व्यापार करार (FTA) अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की टेक्सटाईल, लेदर, केमिकल्स, हस्तकला आणि रत्न यांसारख्या क्षेत्रातील एमएसएमई उद्योगांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. त्यांनी म्हटले की भारत आज डिजिटल क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. व्यवहार करण्याच्या पद्धतीत झालेल्या मोठ्या बदलांमुळे, विशेषतः युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) प्लॅटफॉर्ममुळे हे शक्य झाले आहे.


त्यांनी पुढे सांगितले की डेटा सेंटर्समुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. भारत जगभरातील डेटा साठवण्यासाठी तयार आहे. तसेच देशात संगणकीय क्षमता आणि डेटा सेंटर पायाभूत सुविधा वाढवून मजबूत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) परिसंस्थेची पायाभरणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न:


संरक्षण क्षेत्राबाबत पंतप्रधानांनी सांगितले की बदलत्या परिस्थितीनुसार सैन्याचे आधुनिकीकरण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि देशाची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की राजकीय स्थिरता आणि धोरणात्मक स्पष्टतेमुळे गुंतवणूकदारांचा भारतावर पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या सरकारचा प्रत्येक निर्णय महिलांच्या कल्याणाचा विचार करून घेतला जातो आणि ‘विकसित भारत’ घडवण्यात महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

Comments
Add Comment

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)