रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले. आनंद सागर यांनी मुंबईत ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून पार्किसन्स या आजारामुळे आनंद सागर त्रस्त होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. या आजारपणातच त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.


आनंद सागर हे १९८७ मध्ये तयार झालेल्या रामायण या टीव्ही मालिकेचे सह निर्माते होते. वडील रामानंद सागर यांच्या पश्चात त्यांचा वारसा आनंद यांनीच समर्थपणे पुढे चालवला. आनंद सागर यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्प केले. एकूण पाच भावंडांमध्ये केवळ आनंद सागर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. ‘रामायण’ नंतर त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘जय जय बजरंगबली’ आणि ‘जय शिव शंकर’ सारख्या मालिकांची निर्मिती केली. त्यांनी ‘आँखें’ आणि ‘अरमान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली.


सागर कुटुंबाने आनंद सागर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली आहे. ही बातमी कळताच आनंद सागर यांच्या परिचितांपैकी अनेकांनी शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सागर कुटुंबाने 'आम्ही आमच्या प्रिय वडिलांचे, आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाल्याची माहिती देत आहोत' असे नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Kangana Ranaut : मराठी कलाकार आणि रंगभूमीचे कंगनाकडून भरभरून कौतुक; म्हणाली, '२० वर्षांत पहिल्यांदाच...'

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) बहुचर्चित चित्रपट 'भारत भाग्य विधाता' (Bharat Bhhagya Viddhaata) १२ जून रोजी प्रदर्शित होत

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती

Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात; आक्षेपार्ह व्हिडीओवर माफी, म्हणाला- ती चूक झाली

Pranit More Controversy : बिग बॉस 19 चा स्पर्धक आणि प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वादात सापडला आहे.

Actress Sambhavna : शेवटी देवाने एका आईची हाक ऐकलीच; चक्क ४५ वर्षांच्या अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की तिने आई व्हाव . काहीचं हे स्वप्न पूर्ण होतं तर काहींचं होत नाही

Ritesh Deshmukh : "महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता"; व्हायरल व्हिडीओनंतर रितेश देशमुखचे स्पष्टीकरण, ट्रोलर्सना दिले चोख उत्तर

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश

Priya Bapat : वारंवार मेसेज, जवळीक साधण्याचा प्रयत्न; प्रिया बापटने सांगितला धक्कादायक किस्सा

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.