रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले. आनंद सागर यांनी मुंबईत ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून पार्किसन्स या आजारामुळे आनंद सागर त्रस्त होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. या आजारपणातच त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.


आनंद सागर हे १९८७ मध्ये तयार झालेल्या रामायण या टीव्ही मालिकेचे सह निर्माते होते. वडील रामानंद सागर यांच्या पश्चात त्यांचा वारसा आनंद यांनीच समर्थपणे पुढे चालवला. आनंद सागर यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्प केले. एकूण पाच भावंडांमध्ये केवळ आनंद सागर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. ‘रामायण’ नंतर त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘जय जय बजरंगबली’ आणि ‘जय शिव शंकर’ सारख्या मालिकांची निर्मिती केली. त्यांनी ‘आँखें’ आणि ‘अरमान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली.


सागर कुटुंबाने आनंद सागर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली आहे. ही बातमी कळताच आनंद सागर यांच्या परिचितांपैकी अनेकांनी शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सागर कुटुंबाने 'आम्ही आमच्या प्रिय वडिलांचे, आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाल्याची माहिती देत आहोत' असे नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Mahaprabhu Jagannath : 'तुमच्या मुलांना हा चित्रपट नक्की दाखवा': बाबा रामदेव यांचे ‘महाप्रभू जगन्नाथ’ला समर्थन; 17 जुलै रोजी देशभर प्रदर्शित होणार

रथयात्रेपूर्वी ‘महाप्रभू जगन्नाथ’च्या निर्मात्यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे घेतले आशीर्वाद; 17 जुलै रोजी

Shehnaaz Gill : 'वो मेरा बहोत अच्छा दोस्त है...'; राघव जुयालसोबतच्या नात्याच्या चर्चांवर शहनाज गिलची प्रतिक्रिया

अभिनेत्री शहनाज गिल आणि अभिनेता-डान्सर राघव जुयाल यांच्या नात्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहेत.

Priyanka Chopra : १० वर्षांनंतर उलगडलं गुपित! निक जोनसने प्रियांका चोप्राला पाठवला होता 'हा' पहिला मेसेज आणि मग सुरु झाली...

नवी दिल्ली : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) या ग्लोबल कपलच्या प्रेमकहाणीची सुरुवात नेमकी कशी झाली, हा

LOCK UPP 2 : थेट शिवांगी जोशीच्या 'व्हर्जिनिटी'वरच बोट; LOCK UPP 2 मध्ये नेमकं चाललंय तरी काय?

 Lock Upp 2 :'लॉक अप २'मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शोदरम्यान शिल्पा शिंदे

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानची गूड न्यूज! स्वतःलाच दिलं लाखोंचं बर्थडे गिफ्ट

मुंबई : मराठी टेलिव्हिजन (Marathi Television) विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री (Actress) तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने चाहत्यांसोबत एक

Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला ठोठावली ३ लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांना त्यांच्या 'इंडियाज गॉट लेटंट'(India's Got Latent)