रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले. आनंद सागर यांनी मुंबईत ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून पार्किसन्स या आजारामुळे आनंद सागर त्रस्त होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. या आजारपणातच त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.


आनंद सागर हे १९८७ मध्ये तयार झालेल्या रामायण या टीव्ही मालिकेचे सह निर्माते होते. वडील रामानंद सागर यांच्या पश्चात त्यांचा वारसा आनंद यांनीच समर्थपणे पुढे चालवला. आनंद सागर यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्प केले. एकूण पाच भावंडांमध्ये केवळ आनंद सागर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. ‘रामायण’ नंतर त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘जय जय बजरंगबली’ आणि ‘जय शिव शंकर’ सारख्या मालिकांची निर्मिती केली. त्यांनी ‘आँखें’ आणि ‘अरमान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली.


सागर कुटुंबाने आनंद सागर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली आहे. ही बातमी कळताच आनंद सागर यांच्या परिचितांपैकी अनेकांनी शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सागर कुटुंबाने 'आम्ही आमच्या प्रिय वडिलांचे, आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाल्याची माहिती देत आहोत' असे नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Celebrity Brand Valuation Report 2025 शाहरुख खान भारतातील नंबर-१ सेलिब्रिटी ब्रँड; रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकले मागे

क्रोल (Kroll) या जागतिक संस्थेने आपला 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२५' जाहीर केला आहे. या अहवालानुसार

Nikita Rawal Ranbir Kapoor Controversy : रणबीर कपूरच्या अडचणीत वाढ! 'बीफ' वक्तव्यावरून 'रामायण'वर बहिष्काराचे सावट; निकिता रावलची जाहीर माफीची मागणी

मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आणि निर्माते नमित मल्होत्रा (Namit Malhotra) यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ या दोन

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद

एकता कपूर : एकता कपूरचा सलमान खानला सडेतोड टोला ? म्हणाली- "जेव्हा तुमचा प्रतिस्पर्धी प्रत्येक भागात..."

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) यांच्यात सोशल मीडियावर एक

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'ची तारीख ठरली! सलमान खानची 'करण-अर्जुन' शैलीत एंट्री; कुठे आणि कधीपासून पाहायला मिळणार शो?

मुंबई : सर्वात लोकप्रिय आणि चर्चित रिअॅलिटी शो 'बिग बॉस' (Bigg Boss) आपल्या २० व्या वर्षात पदार्पण करत असून, या ऐतिहासिक