Devendra Fadnavis: मुख्यमंत्री एकाच आठवड्यात दोनदा दिल्लीमध्ये; राजकीय घडामोडींना वेग

दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकाच आठवड्यात ते दोनदा दिल्ली दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. तसे घडल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.


काही दिवसांपूर्वीच कोणालाही थांगपत्ता लागून न देता फडणवीस दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस यांचे एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्ली जाण्यामागील कारण काय, याची चर्चा होऊ लागली होती.



राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट:


मात्र, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळच्या दिल्ली दौऱ्यात भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली.





सदिच्छा भेट:


देवेंद्र फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडला गेले असताना नितीन नवीन यांनी दिल्लीत एका जंगी सोहळ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा गुप्त होता. तसेच त्यावेळी नितीन नवीन हेदेखील बिहारच्या दौऱ्यावर होते. परिणामी या दोघांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे कालच्या (१३ फेब्रुवारी) दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी नितीन नवीन यांची आवर्जून भेट घेतली. नितीन नवीन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर फडणवीस त्यांना पहिल्यांदाच भेटले आहेत. त्यामुळे साहजिकच या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असू शकते. परंतू, या चर्चेचा नेमका तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

Comments
Add Comment

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Mulund Metro Slab Collapse: "दोषींवर कडक कारवाई केली जाईल"; मुलुंडमधील मेट्रो दुर्घटनेवर महापौर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया

मुलुंड: मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा उफाळला - मनोमिलन ठरले औटघटकेचे; नवी मुंबईकरांचे भूखंड घशात घातल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः