इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. भारत सरकारच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके यांनी आभार व्यक्त केले आहेत.


राष्ट्रपती दिसानायके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान मध्यपूर्वेतील संघर्षामुळे श्रीलंकेला इंधन पुरवठ्यात येत असलेल्या अडचणींबाबत त्यांनी माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की भारताने तात्काळ मदतीचा हात पुढे केला आणि त्यासाठी ते भारताचे आभारी आहेत.


शनिवारी कोलंबो येथे ३८,०००  मेट्रिक टन इंधन पोहोचले. सध्याच्या संकटाच्या काळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पूर्ण सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करत त्यांचे आभार मानले.दरम्यान भारताने श्रीलंकेला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेकदा मदत केली आहे.

Comments
Add Comment

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी