Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने आपला निर्णय बदलला असून भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. दरवर्षी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरुवातीला गाभारा दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता महाशिवरात्रीला येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पूर्वीप्रमाणेच थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार आहे. भाविकांना केवळ दर्शनच नाही, तर महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून दर्शन घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सुलभ दर्शनासाठी आता मंदिर प्रशासनाकडून विशेष तयारी केली जात आहे.



गाभारा दर्शन बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी


महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पाहायला मिळत आहे. गर्दीचे नियंत्रण आणि सुरक्षेचे कारण देत यावर्षी महाशिवरात्रीला 'गाभारा दर्शन' बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला होता. आता नव्या नियमानुसार भाविकांना पिंडीला स्पर्श करून किंवा डोके टेकवून दर्शन घेण्याऐवजी केवळ दरवाजातूनच दर्शन घेता येणार होते. ओंकारेश्वर मंदिराच्या धर्तीवर भाविकांना बाहेरूनच जलाभिषेक करण्याची सुविधा देण्यात येणार होती. ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून पहाटे ६ वाजेपर्यंतच दर्शनाची मुभा देण्यात आली होती. देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. "दर्शन घेण्यासाठी ४-५ तास लागले तरी चालतील, मात्र आम्हाला गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शनच हवे," अशी मागणी भाविकांकडून होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या या तीव्र भावना लक्षात घेऊन प्रशासन आपल्या निर्णयात बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



प्रशासनाने मागे घेतला बंदीचा निर्णय


शेकडो वर्षांची 'स्पर्श दर्शनाची' परंपरा खंडित न करता भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार आहे. सुरुवातीला गर्दीच्या नियोजनासाठी घातलेली बंदी आता पूर्णपणे उठवण्यात आली आहे. गाभारा दर्शन आणि स्पर्श दर्शनामुळे भाविकांना रांगेत अधिक वेळ लागण्याची शक्यता असली, तरी भाविकांनी या निर्णयाचे मनापासून स्वागत केले आहे. प्रशासनाने दाखवलेल्या या लवचिक भूमिकेबद्दल शिवभक्तांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या यात्रेसाठी आता देशभरातून येणाऱ्या भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून, मंदिर परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड

राज्यात हवामानात बदलाचे संकेत; फेब्रुवारीत 'या दिवशी' काही भागांत कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरडे वातावरण राहिल्यानंतर आता राज्यात हवामानाची घडी बदलताना दिसत आहे.