राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत लोकसभेत प्रस्ताव मांडला आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


राहुल गांधींनी संसदेत निराधार विधाने करून देशाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप निशिकांत दुबे यांनी केला आहे. राहुल गांधींचे संसदेचे सदस्यत्व त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. दुबे यांनी यासाठी लोकसभेत ‘स्वतंत्र प्रस्ताव’ सादर केला आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
हक्कभंग ऐवजी स्वतंत्र प्रस्ताव


राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना केंद्र सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत करारात देश विकला, असा आरोप केला होता. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने त्यांच्याविरोधात मांडलेल्या प्रस्तावामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे. सभागृहात निराधार विधाने करून लोकसभेची दिशाभूल केल्याचा आरोप करत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींविरोधात ‘हक्कभंग नोटीस’ दाखल करण्याचे संकेत दिले होते. पण, दुबेंनी हक्कभंग ऐवजी ‘स्वतंत्र प्रस्ताव’ मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाद्वारे गंभीर विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणता येते.


याबाबत दुबे यांनी सांगितले की, राहुल गांधी देशाला दिशाभूल करत आहेत. या प्रस्तावात मागणी केली आहे की या प्रकरणावर चर्चा व्हावी, राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांना आयुष्यभर निवडणूक लढण्यावर प्रतिबंध लावावा. दुबे यांनी स्पष्ट केले की राहुल गांधींविरुद्ध कोणताही विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याचा त्यांचा मानस नाही. हा एक स्वतंत्र प्रस्ताव असून, गांधींचे संसदेतून निलंबन करण्याची मागणी त्यात केली आहे. राहुल गांधी जॉर्ज सोरोससारख्या बाह्य शक्तींच्या पाठिंब्याने देशाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.


दरम्यान, राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही एखाद्या देशाकडून तेल खरेदी करू शकत नाही, असे अमेरिका सांगते त्यावेळी भारताची ऊर्जा सुरक्षा बाह्यशक्तीच्या हातात आहे असा त्याचा अर्थ होतो.अमेरिकेने भारतावरील २५ टक्के टॅरिफ कमी केले, त्यावेळी ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असे सांगितले. राहुल गांधी यांनी याचाच संदर्भ देऊन सभागृहात सरकारला धारेवर धरले होते.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.