UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेचा विचार जपला, त्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. ज्या परभणीने आजवर शिवसेनेच्या भगव्याला भक्कम साथ दिली, त्याच शहरात आता केवळ सत्तेच्या लांगुलचालनासाठी उबाठा गटाने मुस्लिम महापौर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'मुंबईत जर उबाठाची सत्ता आली असती, तर तिथेही बुरखेवालीच महापौर दिसली असती', या भाजपच्या दाव्यावर आता परभणीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.


भाजप मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच देणार, हे स्पष्ट असतानाही उबाठा गटाने मुंबईकरांच्या मनात सातत्याने 'फेक नॅरेटिव्ह' पसरवण्याचे काम केले. मात्र, आता त्यांनी परभणीत मुस्लिम महापौर देऊन स्वतःचा खरा चेहरा उघड केला आहे. प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी शहरात उबाठा गटाने महापौरपदासाठी सय्यद इकबाल यांची निवड केली. याउलटज्या काँग्रेसवर लांगुलचालनाचा आरोप होतो, त्यांनी मात्र उपमहापौरपदासाठी गणेश देशमुख यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीच्या राजकीय वर्तुळात आणि निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.



बाळासाहेबांना साथ देणारे शहर


परभणी हे शहर नेहमीच हिंदुत्ववादी विचारांशी जोडलेले राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इथल्या मतदारांनी सातत्याने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. ज्या शहरात शिवसेनेची वाढच मुळी प्रखर हिंदुत्वाच्या जोरावर झाली, तिथे केवळ राजकीय तडजोडीपोटी मुस्लिम महापौर लादणे, हा सामान्य हिंदू मतदारांचा विश्वासघात असल्याची भावना जनमानसात उमटत आहे.



हिंदू मतदारांमध्ये नाराजीचा सूर


उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या राजकीय सोयीसाठी मूळ विचारांना बाजूला सारल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसले आहे. मात्र, परभणीतील या निर्णयाने 'जनाब सेने'चा खरा चेहरा समोर आला आहे. "बाळासाहेबांचे विचार आता फक्त नावालाच उरले असून, प्रत्यक्षात उबाठा गट केवळ विशिष्ट मतांच्या राजकारणासाठी लांगुलचालन करत आहे," अशी टीका भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नगरसेवक नवनाथ बन यांनी केली. दरम्यान, उबाठाच्या या निर्णयामुळे परभणीतील हिंदू मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना

Vijay Mallya: तुम्हाला भारतात यावेच लागेल, ही तुमची शेवटची संधी; उच्च न्यायालयाने विजय मल्याला बजावले

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१२ फेब्रुवारी) फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध कडक टिप्पणी

T20 World Cup 2026: 'या' खेळाडूला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात

श्रीलंका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबद्दल अफगाणिस्तानचा अनुभवी

राज्य सरकारचे टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

Navnath Ban: काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये; नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)