महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे. १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांसाठी प्रति युनिट दरात सुमारे एक रुपयाची कपात करण्यात आली असून, आता त्यांना ८.१४ रुपयांऐवजी ७.१० रुपये मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणच्या पाच वर्षांच्या वीजदर कपात याचिकेला मंजुरी दिल्याने हा मार्ग मोकळा झाला आहे.


गेल्या वर्षभरापासून ही याचिका न्यायालयीन प्रक्रियेत अडकली होती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, तांत्रिक बाबींची पूर्तता करून आयोगाने आता नवा आदेश प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीजदर कमी होणार आहेत.


नवीन दरपत्रकानुसार, घरगुती ग्राहकांसाठी १०० ते ३०० युनिटपर्यंतचा दर १३.२३ रुपयांवरून १२.९४ पैसे इतका कमी झाला आहे. औद्योगिक ग्राहकांसाठीही दिलासा मिळाला असून, त्यांचा दर १०.८८ रुपयांवरून १०.७१ पैसे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांच्या सवलती महावितरणने कायम ठेवल्या आहेत. दरम्यान, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आयोगाने ई-वाहन चार्जिंग स्टेशनसाठी २०२६-२७ या वर्षासाठी ९.५० रुपये प्रति युनिट दर निश्चित केला आहे. हा दर २०२८-२९ पर्यंत स्थिर राहणार आहे. यामुळे मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना आपल्या आवारात लघुदाब चार्जिंग केंद्र सुरू करणे अधिक परवडणारे होणार आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील