पूर्व उपनगराला १८ वर्षांनंतर लाभला महापौर

मुंबई :  मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्यावतीने रितू तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून या प्रतिस्पर्धी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. येत्या बुधवारी या निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाईल. रितू तावडे या पूर्व उपनगरातील घाटकोपर पूर्व भागातील असून तावडे यांच्या रुपातून पश्चिम उपनगराला तब्बल १८ वर्षांनंतर महापौर लाभणार आहे. यापूर्वी सन २००५-०७ या कालावधीत पूर्व उपनगरातून दत्ता दळवी हे शेवटचे महापौर झाले होते.


मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी येत्या बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.. यासाठी शनिवारी ०७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध असल्यामुळे महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड होणार आहे . रितू तावडे यांच्या रुपात पूर्व उपनगराला तब्बल १८ ते २० वर्षांनी महापौर लाभला आहे. सन १९९६-९७ पासून सन २०२२ पर्यंत तत्कालिन शिवसेनेचे महापौर निवडून येत असून या कालावधीमध्ये एकमेव महापौर हा पूर्व उपनगरातील लाभला आहे. सन २००५- २००७मध्ये पूर्व उपनगरातील विक्रोळीतील नगरसेवक दत्ता दळवी यांची निवड करण्यात आली होती. या कालावधीमध्ये सात महापौर हे शहर भागातील होते . तर तीन महापौर हे पश्चिम उपनगरातील होते.


काँग्रेसच्या सन १९९२ ते ९७च्या काळातील चार महापौरांपैंकी चारही महापौर पनगरातील होते.. यामध्ये तीन महापौर पूर्व उपनगराचे आणि एक महापौर पश्चिम उपनगरातील होते.

Comments
Add Comment

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून UPI मधून पटकन पैसे काढता येणार

मुंबई: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत. आपल्या हक्काचे पैसे

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई

Gold-Silver Rate: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात २५०० रुपयांची घसरण; चांदीचे दरही घसरले

मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली होती.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांचं पहिलं ट्विट; म्हणाल्या...

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र आज

उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा पोटभाडेकरू असलेला उबाठा गट हा शून्यात हरवलेला पक्ष आहे असा घणाघात