ZP Election Result 2026: वळसे पाटील, तानाजी सावंत, भरत गोगावलेंनी गड राखले

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी आपला दबदबा कायम ठेवत विजय मिळवला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, तानाजी सावंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या कुटुंबीयांनी गड राखत राजकीय वारसा पुढे नेला, तर काही ठिकाणी मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचेही चित्र पाहायला मिळाले.


आंबेगाव मतदारसंघात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी पारगाव जरकवाडी गटातून २ हजार १३० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला. पुरंदर तालुक्यात माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची कन्या रूपाली झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला. विशेष म्हणजे, पुरंदर तालुक्यातील दोन्ही पंचायत समिती सदस्यही राष्ट्रवादी काँग्रेसचेच निवडून आल्याने तालुक्यावर पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे.


सोलापूर जिल्ह्यातील हाय-व्होल्टेज लढतींमध्येही प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबीयांनी बाजी मारली आहे. माढा तालुक्यातील मानेगाव गटातून माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी भाजपच्या तिकिटावर ६ हजार ८०० मतांच्या विक्रमी मताधिक्याने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. याच जिल्ह्यात भाजप नेते राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी दहिगाव गटातून विजय मिळवत राजकीय क्षेत्रात यशस्वी प्रवेश केला आहे.


दुसरीकडे, रायगड जिल्ह्यात आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला.



परभणीत घराणेशाही नाकारली:


दरम्यान, परभणी जिल्ह्यात मतदारांनी घराणेशाहीला स्पष्ट नकार दिल्याचे चित्र समोर आले आहे. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांच्या कुटुंबातील पाच उमेदवारांपैकी केवळ एकालाच विजय मिळवता आला आहे. वरपुडकर यांचा मुलगा, मुलगी, सून आणि एक पुतणा या चौघांना पराभवाला सामोरे जावे लागले असून, या निकालाने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील; मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा