अजित पवारांच्या निधनामुळे भाजपने विजयाचा जल्लोष टाळला

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.


भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत घेत घेतात. मात्र, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रचारसभा न घेण्याचे आणि शांत, संघटनात्मक पातळीवर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते. या संवेदनशील निर्णयाचा सर्व कार्यकर्त्यांनी आदर केला असून, निवडणूक निकालांनी ही कार्यपद्धती जनतेला मान्य असल्याचे सिद्ध केले आहे, असे चव्हाण म्हणाले.


रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, कष्टकरी तसेच शहरी व ग्रामीण भागातील सर्व घटकांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत जे प्रभावी काम केले, त्याचीच ही फलश्रुती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



८० टक्क्यांहून अधिक सदस्य महायुतीचे


- कोरोना काळानंतर या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. १२ जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता स्थापन होईल, असे चित्र दिसत आहे. तसेच १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा जास्त ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे एकत्रित निकाल पाहता, ८० टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधी महायुतीचे निवडून येताना दिसत असून, हा जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे, असे ते म्हणाले.


- कोकणातील निकालांवर भाष्य करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता कोकण महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने दिलेला कौल अत्यंत महत्त्वाचा असून, या विश्वासाबद्दल सर्व मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

Rajya Sabha : राज्यसभेतही पेपरफुटीविरोधी विधेयक मंजूर; दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटी दंडाची तरतूद

लोकसभेनंतर राज्यसभेतही आवाजी मतदानाने मंजुरी; एआयद्वारे फसवणूक, सायबर हॅकिंग आणि संघटित पेपरफुटीवरही कठोर

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्तपदी बढती, तर सहायक आयुक्तपदावरील आठ अधिकाऱ्यांची खांदेपालट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्त

Newspaper and Magazine Subscriptions : उपमुख्यमंत्र्यांसह, सर्व मंत्र्यांना मिळणारी वृत्तपत्रे, नियतकालिके बंद

 सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; संबंधित मंत्र्यांच्या विभागांनी खर्च उचलण्याची सूचना मुंबई : उपमुख्यमंत्री,

NEET Protest : NEET आंदोलनात पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य तरुणीला पडलं महागात

जंतर-मंतर आंदोलनातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; BNS अंतर्गत गुन्हा दाखल  दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याआधी शिर्डी विमानतळावरील एअर कार्गो सुविधा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी मुंबई : नवी मुंबई

Supreme Court : पोलिसांना पॅलेट गन वापरण्याचा अधिकार! आंदोलनावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली: आंदोलनादरम्यान सुरक्षादलांकडून करण्यात येणाऱ्या 'पॅलेट गन' (पालखी किंवा छऱ्यांच्या बंदुकीचा)