अजित पवारांच्या निधनामुळे भाजपने विजयाचा जल्लोष टाळला

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.


भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत घेत घेतात. मात्र, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रचारसभा न घेण्याचे आणि शांत, संघटनात्मक पातळीवर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते. या संवेदनशील निर्णयाचा सर्व कार्यकर्त्यांनी आदर केला असून, निवडणूक निकालांनी ही कार्यपद्धती जनतेला मान्य असल्याचे सिद्ध केले आहे, असे चव्हाण म्हणाले.


रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, कष्टकरी तसेच शहरी व ग्रामीण भागातील सर्व घटकांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत जे प्रभावी काम केले, त्याचीच ही फलश्रुती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



८० टक्क्यांहून अधिक सदस्य महायुतीचे


- कोरोना काळानंतर या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. १२ जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता स्थापन होईल, असे चित्र दिसत आहे. तसेच १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा जास्त ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे एकत्रित निकाल पाहता, ८० टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधी महायुतीचे निवडून येताना दिसत असून, हा जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे, असे ते म्हणाले.


- कोकणातील निकालांवर भाष्य करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता कोकण महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने दिलेला कौल अत्यंत महत्त्वाचा असून, या विश्वासाबद्दल सर्व मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

२०१९ मधील लाभधारक शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; 'भाडे के टट्टू'वर आक्षेप घेणाऱ्यांना संबोधले 'सुपारीबाज'

मुंबई : राज्यातील बळीराजाला आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणाऱ्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी

Narendra Modi भारताशी असलेले नाते अटळ आहे', न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

ऑकलंड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात करत असताना,

NPPA : महागडी औषधे आता खिशाला परवडणार, ३९ औषधांच्या किमती एनपीपीएद्वारे नियंत्रित

नवी दिल्ली : सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘नॅशनल

Pakistani Gangster : एटीएसने विदर्भातून दहा जणांना घेतले ताब्यात, पाकिस्तानी गँगस्टरशी सोशल मिडीयावर संपर्काचा संशय

नागपूर : महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज, शुक्रवारी राज्यभर केलेल्या कारवाईंतर्गत

Astronaut Anil Menon : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन अंतराळ मोहिमेसाठी १४ जुलैला होणार रवाना

कझाकस्तान : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन हे १४ जुलै रोजी कझाकस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून

मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई : 'उर्स' उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज