मुंबई विमानतळावर 'विश्वविजेत्या' युवा सेनेचे शाही स्वागत, स्वागताला चाहत्यांची अलोट गर्दी

मुंबई   : हरारेच्या मैदानावर तिरंगा फडकवून सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणारा भारताचा युवा संघ आज मायदेशात दाखल झाला. दुपारी मुंबई विमानतळावर विमानाने लँडिंग करताच खेळाडूंचे जंगी आणि शाही स्वागत करण्यात आले. हरारेमध्ये इंग्लंडला १०० धावांनी धूळ चारून विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान करणाऱ्या या 'यंग ब्रिगेड'ला पाहण्यासाठी मुंबईकरांनी विमानतळाबाहेर एकच गर्दी केली होती.


कर्णधार आयुष म्हात्रे आणि फलंदाजीतील नवा तारा वैभव सूर्यवंशी विमानतळाबाहेर येताच 'इंडिया-इंडिया'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात खेळाडूंचे स्वागत झाले. चाहत्यांचे हे अफाट प्रेम पाहून कर्णधार आयुष म्हात्रे भारावून गेला होता. खेळाडूंनी चाहत्यांचे अभिवादन स्वीकारत आणि सेल्फी देत आपला मार्ग काढला. कुटुंबियांच्या भेटीने खेळाडूंचे डोळेही पाणावले होते. यावेळी कर्णधार आयुष म्हात्रे याच्या वडिलांनी, योगेश कमलाकर म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आयुषने विश्वचषक जिंकून आणला आणि संपूर्ण राष्ट्राला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे," असे म्हणत त्यांनी आपल्या मुलाच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०२८ आणि २०२२ या वर्षी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता झिम्बाब्बे आणि नामिबिया येथे झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा भारतीय संघाने जिंकला. भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. तसेच या सामन्यात अंतिम सामन्यात भारताने ५० षटकात विक्रमी ९ बाद ४११ धावा उभारल्या होत्या. यामध्ये एकट्या वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकारांसह १७५ धावा केल्या होत्या. आयुष म्हात्रेने ५३ धावांची खेळी केली होती. याशिवाय संघातील इतर खेळाडूंनीही चांगले योगदान दिले होते. त्यानंतर ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३११ धावांवरच सर्वबाद झाला. भारताकडून गोलंदाजीत आरएस आंब्रिश, दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी मोलाचे योगदान दिले होते.

Comments
Add Comment

श्रीलंकेच्या फिरकीपुढे आयर्लंडची शरणागती

२० धावांनी थरारक विजय मिळवत यजमान संघ सरस कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात यजमान

नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने

टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाकिब अव्वलस्थानी

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होताच विश्वचषकात

इंग्लंडचा ४ धावांनी निसटता विजय, नेपाळची झुंज अपयशी

मुंबई  : टी-२० विश्वचषकातील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने नेपाळचा ४ धावांनी पराभव केला. शेवटच्या

'कीवीं'चा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, टिम सायफर्ट आणि ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी

चेन्नई  : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचे १८३ धावांचे

IND vs USA T20 : भारतीय संघाचं टेन्शन संपलं, पहिल्या विजयानंतर काय म्हणाला कॅप्टन सूर्यकुमार यादव?

मुंबई: टी- ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरुवात शनिवारी पाकिस्तानच्या विजयाने झाली तर रात्री झालेल्या सामन्यात भारतीय