रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६ मध्ये सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर होऊन गेल्या. त्यानंतर १९९४- ९५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर मात्र सन १९९७ -९८ पासून ते २०२२ या कालावधीत तत्कालीन शिवसेनेच्या अखंड सलग पाच महिला महापौर झाल्या आहेत.


मात्र यावेळी २०२६ मध्ये महापौर पदासाठी खुला वर्ग महिला आरक्षण असल्याने भाजपच्यावतीने रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवार म्हणून घोषित करून त्यांनी शनिवारी आपला अर्ज सादर केला आहे. प्रतिस्पर्धी पक्षाकडून अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. आता केवळ निवडणुकीची औपचारिकता शिल्लक असून बुधवारी त्यांना महापौर म्हणून पिठासीन अधिकारी घोषित करणार आहेत.


मुंबई महापालिकेच्या इतिहासात महापौर पद हे मोठे प्रतिष्ठेचे पद आहे. मुंबईच्या महापौरांना विशेष मोठे अधिकार नाहीत. मात्र महापौर पद हे महत्वाचे आहे. मुंबईत देशाच्या राष्ट्रपतींचे आगमन झाल्यास राजशिष्टाचारानुसार मुंबईच्या महापौरांना त्यांचे स्वागत करण्याचा पहिला मान दिला जातो. महापालिकेत महापौरांना काही मर्यादित अधिकार असल्याने त्या आर्थिक बाबींशी संबंधित प्रस्तावांना मान्यता देऊ शकतात. त्यांना महापौर निधीतून वैद्यकीय उपचारासाठी गरजू लोकांना आर्थिक मदत करू शकतात. महापौर शिक्षक पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांच्या नावांची शिफारस करू शकतात. आणखीन काही मर्यादित स्वरूपाचे अधिकार महापौरांना आहेत. त्यामुळे महापौर पद हे प्रतिष्ठेचे आहे. मुंबई महापालिकेत १९९७ पासून सलग २६ वर्षे तत्कालीन शिवसेनेचे महापौर होते. विशेष म्हणजे १९५५ पासून ते आजपर्यंत मुंबईत ज्या सात महिला महापौर झाल्या आहेत, त्यामध्ये तत्कालीन शिवसेनेच्या पाच महिला महापौरांचा समावेश आहे.



मुंबई महापालिकेतील महिला महापौर


१९५५ -१९ ५६ : सुलोचना मोदी


१९९४ - १९९५ :ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर


१९९७ -१९ ९८ : विशाखा राऊत


२००७ -२० ०९ : डॉ. शुभा राऊळ


२००९ - २०१२ : श्रद्धा जाधव


२०१४ - २०१७ : स्नेहल आंबेकर


२०१९ -२० २२ : किशोरी पेडणेकर

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना