मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या 'कॅसानूर फॉरेस्ट डिसीज' अर्थात 'मंकी फिव्हर'वर भारतीय संशोधकांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने या गंभीर आजारावर पूर्णतः स्वदेशी बनावटीची, सुधारित आणि अधिक प्रभावी लस विकसित केली असून, या लसीच्या मानवी वैद्यकीय चाचणीच्या पहिल्या टप्प्याला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या संशोधनामुळे विशेषतः महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


काय आहे मंकी फिव्हर आणि त्याचा धोका?


कॅसानूर फॉरेस्ट डिसीज हा प्रामुख्याने 'टिक-बॉर्न' म्हणजेच गोचीडजन्य विषाणूमुळे होणारा आजार आहे. १९५७ मध्ये कर्नाटकच्या कॅसानूर जंगलात या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता, म्हणून याला ' केएफडी' असे नाव पडले. हा विषाणू प्रामुख्याने 'हेमाफिसालिस स्पिनिगेरा' या प्रकारच्या गोचिडांमार्फत पसरतो. हे गोचीड बाधित माकडे आणि उंदरांना चावल्यानंतर जेव्हा मानवाला चावतात, तेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो. माकडांच्या मृत्यूशी या आजाराचा थेट संबंध असल्याने याला स्थानिक भाषेत 'मंकी फिव्हर' किंवा 'मंकी डिसीज' म्हटले जाते. या आजारात अचानक तीव्र ताप येणे, उलट्या, जुलाब आणि गंभीर प्रकरणांमध्ये शरीरातून रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसतात. धक्कादायक बाब म्हणजे, बाधित रुग्णांपैकी ५ ते १० टक्के रुग्णांचा यात मृत्यू होतो आणि यावर अद्याप कोणताही ठोस औषधी उपचार उपलब्ध नाही.


महाराष्ट्रातील पश्चिम घाटासाठी 'कवच'


महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये काम करणारे वन कर्मचारी, शेतकरी आणि लाकूडतोडे यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजेच जानेवारी ते एप्रिल या काळात या आजाराचा प्रादुर्भाव शिखरावर असतो. या पार्श्वभूमीवर, आयसीएमआरच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था यांनी संयुक्तपणे ही 'अॅडज्युव्हांटेड इनएक्टिव्हेटेड' लस विकसित केली आहे. ही लस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्षमपणे जागृत करण्यास मदत करते. ही दोन मात्रांची लस असून, २८ दिवसांच्या अंतराने तिचे दोन डोस दिले जातील.

Comments
Add Comment

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी

अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या

मोहम्मद खान अन्सारीने शिक्षिकेला केली मारहाण

बडोदा (वडोदरा) : बारावीच्या परीक्षेसाठी २० मिनिटे उशिराने आलेल्या मोहम्मद खान अन्सारीला शिक्षिकेने जाब विचारला.

नशीब पालटले! दूध आणि पेपर विकणाऱ्या रमेश बाबूंकडे आज ४०० आलिशान गाड्या, जाणून घ्या...

दिल्ली: परिस्थिती कशीही असो, करण्याची इच्छा असेल तर सगळं होतं म्हणतात ते खरं आहे. बेंगळुरूच्या रमेश बाबू यांचे

India -Malaysia Deal: भारत-मलेशियामध्ये प्रमुख करारांवर स्वाक्षरी; दोन्ही देशांचा होणार आर्थिक फायदा

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचा दोन

Rafale Deal: भारताची संरक्षण शक्ती वाढणार; फ्रान्सकडून करणार १०० पेक्षा अधिक राफेल खरेदी

नवी दिल्ली: शत्रुराष्ट्रांच्या कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकार