अखंड भारताचा उदय होईल, भारत तोडण्याची भाषा करणारेच तुटतील : डॉ. मोहन भागवत

मुंबई : भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील; हा १९४७ चा भारत राहिलेला नाही. आगामी २०४७ मध्ये अखंड भारताच्या उदयाची कल्पना आपण सर्वांनी करायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघाच्या स्थापनेच्या १०० वर्षांच्या निमित्ताने मुंबईत आयोजित ‘नवे क्षितिज’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.


डॉ.भागवत यांनी समाज, राष्ट्रीय एकात्मता, आरक्षण, लोकसंख्या संतुलन, भ्रष्टाचार, तंत्रज्ञान, शेती आणि अर्थव्यवस्था या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. गुंडगिरी ही संपूर्ण समाजाची चूक नसून समाज सजग राहिल्यास विध्वंसक प्रवृत्ती आटोक्यात आणता येतात, असे त्यांनी सांगितले. हिंदू आणि शीख समाजातील नातेसंबंधांवर बोलताना त्यांनी दोन्ही समाजांमध्ये रक्तसंबंध तसेच रोटी-बेटीचे नाते असल्याचे नमूद केले. श्री गुरु ग्रंथसाहिबमध्ये संपूर्ण देशातील संतांची वाणी असल्याचे सांगत हिंदू-शीख वेगळे असल्याचा विचार चुकीचा असून आपण सर्व एकच आहोत, असे ते म्हणाले.


आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी संविधानानुसार असलेल्या सर्व आरक्षणांना संघाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. जातीय भेदभाव पूर्णपणे नष्ट व्हायला हवा, असे सांगत, ज्यांनी हजारो वर्षे विषमता सहन केली त्यांच्यासाठी काही काळ सहन करणे हा स्वस्त सौदा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आजची राजकीय व्यवस्था ही मतांसाठी चालते, अशी टीकाही त्यांनी केली.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केवळ कायदे आणि शिक्षांमुळे भ्रष्टाचार संपणार नाही; संस्कारांमुळेच तो नष्ट होईल, असे ते म्हणाले. लोकसंख्या संतुलनाबाबत विवाह हा संस्कार असून तो जबाबदारीने निभावला पाहिजे, असे सांगत जबरदस्तीचे धर्मांतर आणि घुसखोरी ही असंतुलनाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वेच्छेने होणाऱ्या धर्मांतराला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नवीन तंत्रज्ञान आणि एआयच्या युगात रोजगाराच्या संधी कमी होऊ नयेत, यासाठी योग्य धोरणांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हाताने काम करणाऱ्यांचा सन्मान वाढवणे आणि अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


शेतीबाबत बोलताना सेंद्रिय शेतीमुळे खर्च कमी होतो, असे सांगत साठवणूक व प्रक्रिया सुविधांमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळू शकतील, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अनन्या पांडे, करण जोहर, अभिनेता जॅकी श्रॉफ तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मिलिंद म्हैस्कर आणि मनीषा म्हैस्कर यांचा समावेश होता.

Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह