संत कबीर

पंडित होय के आसन मारे
पंडित होय के आसन मारे, लंबी माला जपत है।
अंतर तेरे कपट करतनी, सो भी साहब लिखता है ।।


- डॉ. देवीदास पोटे


संत कबीर यांच्या काव्यात काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा मनोहारी संगम आहे. कबिरांच्या दोह्यातील शब्दांचा जेव्हा आपण आस्वाद घेतो तेव्हा त्या अर्थपूर्ण ओळी आपल्या चिंतनाचा आणि अनुभवाचा विषय होतात. त्यांचे दोहे रसिक मनाच्या कानात गुणगुणतात. कबीरदास टीका-टिप्पणी करताना अतिशय सोप्या, साध्या भाषेचा उपयोग करतात. या रचनेत कबीर म्हणतात, की पंडित मोठे आसन मांडून बसले आहेत आणि हातात एक मोठी माळ घेऊन जप सुरू आहे. पण आतून अंतरंग कसं आहे याचा पूर्ण हिशोब ईश्वरी शक्ती ठेवीत असते.


कबिरांचा रोख वरवर विद्वत्तेचे सोंग करणाऱ्या ढोंगी पंडितांवर आहे. वरवरचा वेश साधुत्वाचा आहे, पण अंतरंगांतील रंग काही काही वेगळेच आहेत. कबीर अशा काही शब्दांत अशा विद्वानांचा समाचार घेतात की, शब्दांचे मार खाणारा जेरबंद होतो आणि उलटून एक शब्दही बोलण्याची हिंमत करीत नाही. पंडित, मुल्ला-मौलवी अशा कुणालाही कबीरांनी सोडलं नाही. ज्याच्या अंगी खरं वैराग्य नाही तो परमेश्वराची भक्ती कशी करू शकणार? शुुद्ध आचार-विचार, स्वच्छ चारित्र्य, प्रेम, समर्पण या अध्यात्म मार्गातल्या महत्त्वाच्या पाऊलखुणा आहेत. नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ॥' असे संत तुकारामांनी सांगितले आहे.


कबिरांची भाषा सहज, सोपी आहे. त्यांच्या भाषेला पंचमोल' असे म्हणतात. कारण त्यांच्या भाषेत बोली भाषेतले अनेक शब्द सापडतात. म्हणून सामान्य जनांना त्यांची भाषा दुर्बोध वाटत नाही. अनेक ग्रंथ वा पोथ्या वाचून कुणी विद्वान पंडित होत नाही, हे त्यांनी ठासून सांगितले. मग खरा पंडित कोण? जो 'प्रेम' ही अडीच अक्षरे जाणतो तो खरा पंडित. हा प्रेमरस भरभरून सेवन केला की माणूस देवेपणाकडे वाटचाल करू लागतो. परमेश्वराला शुद्ध अंतःकरणाने सामोरे जावे असे त्यांचे सांगणे आहे. हा चिरंतन सत्याचा मार्ग आहे. येथे खोटेपणा, लबाडी, ढोंग यांना बिलकुल थारा नाही. म्हणूनच निरर्थक कर्मकांड, बाह्य विधी यांना कबिरांनी विरोध केला. परमेश्वराचे निर्गुण, निराकार स्वरूप ओळखून भक्तिमार्गाचा त्यांनी पुरस्कार केला.


संत कबीर यांनी कवित्वाचे साधन वापरून अध्यात्माची व्यापक बैठक लोकांना उलगडू्न दाखविली. त्यांच्या रचना अनुभूती संपन्न आहेत. या रचनांमधून त्यांनी भारतीय धर्मपरंपरेला एक मानवतावादी आणि व्यापक अधिष्ठान दिले. अमूर्त तत्त्वाला शब्दरूप करण्याचे त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन