हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या लोकल वेळापत्रकाला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या वातानुकूलित लोकलचे दरवाजे विलंबाने लागत असल्याने, प्रत्येक स्थानकात लोकल उशिराने पोहचत होती. तसेच चेंबूर रेल्वे स्थानकादरम्यान आपत्कालीन साखळी ओढल्याने, लोकलचा खोळंबा झाला. परिणामी, संपूर्ण दिवसभर प्रवाशांना लोकलच्या लेटलतीफ कारभाराला सामोरे जावे लागले.


वातानुकूलित लोकलमुळे हार्बर मार्गावरील वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. आज वातानुकूलित लोकलच्या दरवाज्यात तांत्रिक बिघाड झाल्याने, या लोकलसह इतर सामान्य लोकल विलंबाने धावल्या. गेल्या काही


दिवसांपासून प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत होता. तर, आज सकाळी ७.४० वाजता सीएसएमटी-पनवेल वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होण्यास विलंब होत असल्याने, रेल्वे स्थानकात बराच वेळ लोकल उभी राहत होती. वातानुकूलित लोकल स्थानकात येण्यास, दरवाजे खुले होण्यास, पुन्हा हे दरवाजे बंद करण्यास आणि लोकल मार्गस्थ होण्यास बराच वेळ जात होता. यात वेळ खर्ची झाल्याने मागून येणाऱ्या लोकलला विलंब झाला. परिणामी, सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. गुरुवारी दुपारी १२.२४ वाजता पनवेल ते सीएसएमटी लोकल सुटली. ही लोकल दुपारी १.१५ च्या सुमारास चेंबुर येथे पोहचली असता, या लोकलची आपत्कालीन साखळी (अलार्म चेन पुलिंग) ओढण्यात आली. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा २० मिनिटे उशिराने धावत होती.

Comments
Add Comment

१ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : रविवार, १ मार्च २०२६ रोजी उपनगरीय रेल्वे सेवांवर मोठ्या प्रमाणात देखभाल आणि अभियांत्रिकी कामे हाती

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने