विलिनीकरणाची घाई केलेल्यांनी आधी कोणत्या पक्षात जाणार किंवा कुणामध्ये विलिनीकरण करणार या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी -आनंद परांजपे

ठाणे : दादांच्या अपघाती मृत्यूनंतर अजूनही आम्ही दुःखातून सावरलेलो नाही, त्यांचे अग्निसंस्कार होण्याच्या आधीच विलिनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली?असा सवाल उपस्थित करतानाच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे, आम्ही २०२३ मध्ये महायुतीत सामील झालो आहे, त्यामुळे विलिनीकरणाची घाई झालेल्यांनी आधी कोणत्या पक्षात किंवा कुणामध्ये विलिनीकरण करणार या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.


अंजली दमानिया यांचे वाक्य म्हणजे अत्यंत नीच आणि नालायक प्रवृत्ती कशी असते याचे उदाहरण आहे अशा शब्दात आपला संताप आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे.


आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल , प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि पार्थ पवारांवर संशय व्यक्त करणे बरोबर नसून अशा वेळेला अशा पध्दतीचा संशय व्यक्त करुन त्यांनी यापेक्षा नीचता आणि नालायकपणा काय असू शकत नाही असा संतापही व्यक्त केला.


शरद पवार गटाच्या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन अग्निसंस्कार होण्याच्या आधी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली. त्यांनी आधी एनडीए आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सामील होणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि जी भूमिका २ जुलैला अजितदादा पवार यांनी घेतली होती त्यावर आम्ही अजूनही ठाम आहोत असेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.


अंजली दमानिया यांना कोर्टाने अधिकार दिला आहे. अंजली दमानिया या सो कॉल्ड समाजसेविका असून त्यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले ते आजपर्यंत कोर्टात टिकलेले नाहीत असेही आनंद परांजपे म्हणाले.


दरम्यान आत्ताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजून चौकशी पूर्ण झालेली नाही हे स्पष्ट केले आहे त्यामुळे सो कॉल्ड समाजसेविकेने देखील थांबावे आणि जे काही सत्य आहे ते समोर येईल अशी विनंती आनंद परांजपे यांनी केले आहे.


संजय राऊत यांचा सकाळी नऊ वाजताचा भोंगा सुरू होऊन दररोज राजकीय आरोप करत असतात मात्र त्यांनी त्यांचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुखांना दिला तर त्यांच्या पक्षाशी होत असलेली पिछेहाट थांबेल हे त्यांच्या भल्याचे राहिल.चौकशी समिती चौकशी करत आहे मात्र संजय राऊत यांनी स्वतःची चौकशी करून कोणत्यातरी निष्कर्षाला पोचून महाराष्ट्राची दिशाभूल करू नये असा सल्लाही आनंद परांजपे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

काजू उत्पादक शेतकऱ्याला जगवण्यासाठी आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ करा - आमदार निलेश राणे

- निलेश राणे यांची विधानसभेत मागणी; अमली पदार्थ, गो-हत्या आणि बेकायदा वृक्षतोडीवरून धरले धारेवर मुंबई : कोकणातील

डिझेल खरेदी निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची ग्वाही

- डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही मुंबई : एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा

स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणी राज्यभरात धडक मोहिम राबवणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देण्यासंदर्भात समिती नेमून अभ्यास करणार मुंबई : "स्त्री-भ्रूणहत्याप्रकरणी

धक्कादायक! सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी ९ जणांनी विकली किडणी

- सहा सावकारांची संपत्ती गोठवणार; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर निर्देश मुंबई : खासगी सावकारांकडून घेतलेल्या

मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून

Legislative Council Election 2026 : कोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला लॉटरी लागणार ? विधान परिषदेच्या 'या' ९ जागा होणार रिक्त!

मुंबई : येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी उडणार आहे. सध्याचे संख्याबळ