महापालिकेत पहिले पक्ष कार्यालय मिळवण्यात भाजपने मारली बाजी

शुक्रवारी विधीवत पुजा करून करणार प्रवेश


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रत्येक पक्षाला नगरसेवक संख्येनुसार पक्ष कार्यालय वितरीत करण्यात येत असून आपले जुने कार्यालय कायम राखण्यात भाजपला यश आले आहे. भाजपचे नगरसेवक आपल्या जुन्याच जागेवरील नुतनीकरण केलेल्या कार्यालयात पुन्हा जाणार आहेत. या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे वास्तू शांती तथा पुजन करून याचे उद्घाटन तथा प्रवेश होणार आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना आपल्या हक्काचे कार्यालय मिळाले असले तरी बाकीच्या पक्षांना रंगरंगोटी आणि स्वच्छतेची कामे पूर्ण झाल्यानंतरच पक्ष कार्यालये वितरीत होणार आहेत.


मुंबई महापालिकेने निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या गणसंख्येनुसार संबंधित राजकीय पक्षांना छोट्या आणि मोठ्या आकाराची पक्ष कार्यालये वितरीत केली जाणार आहे. त्यानुसार सध्या सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या जुन्या इमारतीतील तळ मजल्यावरील कार्यालयांच्या नुतनीकरणाच्या कामावर शेवटचा हात फिरवला जात आहे. त्यानुसार भाजपला ज्यांचे जुने कार्यालय नुतनीकरण करून वितरीत केले जात आहे. या कार्यालयात शुक्रवारी विधीवत पुजा करून कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे भाजपचा महापौरपदाचा उमेदवार हा या कार्यालयातून औक्षण करून अर्ज भरण्यास जाणार आहे. यासाठी भाजपने अत्यंत तातडीने पुजाअर्चा उरकून घेण्याचा प्रयत्न केला.



शिवसेना आणि भाजप चेपणार उबाठाला


मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे कार्यालय शिवसेनेला सोडण्याचा विचार केला होता. परंतु काँग्रेसचे कार्यालय स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे उबाठाच्या वाट्याला असणाऱ्या जागेतील काही भाग कमी करून शिवसेनेला दिली जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीचा भाग शिवसेनेला आणि भाजपच्या शेजारील कार्यालयाचा भाग उबाठाला सोडला जाणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या मधोमध उबाठाचे कार्यालय राहणार असल्याने या महायुतीच्या पक्षाकडून उबाठाला चेपले जाणार आहे.



मनसे आणि एमएमआयएम साथ साथ


मुंबई महापालिकेच्या जुन्या इमारतीतील तळ मजल्यावर महिला आणि बाल कल्याण समितीच्या कार्यालयाचा भाग विभागून मनसे आणि एमआयमएमला दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेत मनसे आणि एमआयएम हे पाठिला पाठ लावून बसणार आहे. हे दोन्ही पक्ष कार्यालये बाजु बाजुला असणार आहेत.

Comments
Add Comment

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे