शिरोडकर मंडईतील निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला

मंडईत टॉयलेटसाठी नाही पाणी, गटार तुंबलेली


मुंबई : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आला असून हे काम सध्या रखडलेले आहे. परंतु, या मंडईतील परवानाधारक कोळी भगिनींना अर्धवट काम राहिलेल्या मंडईतील तळघरातील वास्तूत पुन्हा जागा उपलब्ध करून दिली आहे. पण यामध्ये निम्म्या कोळी भगिनींचा बाजारच उठवला गेला आहे. विशेष म्हणजे या मंडईत मागील पाच वर्षांपासून या कोळी भगिनींचे पुनर्वसन केले असले तरी याठिकाणी पिण्यासह इतर पाण्याची तसेच गटार तुंबून अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे . त्यामुळे आधीच निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला आता ज्या व्यवसाय करतात त्यांच्या समस्येकडेही बाजार विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने कोळी भगिनींनी याठिकाणी व्यवसाय करायचा कसा असा सवाल केला जात आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने परेल येथील शिरोडकर मंडईच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मंडईच्या जागी मासळी बाजारसह मार्केट आणि कामगार वसाहत अशाप्रकारे बांधकाम हाती घेतले आहे.. परंतु, या इमारतीचे बांधकाम अर्धवट असून चार मजल्यांचे बांधकाम झाल्यानंतर विकासकाने अर्धवट सोडून दिल्यानंतर जिथे कोळी बांधवांना मागील बाजुस दिलेल्या पर्यायी जागेतून हलवून या अर्धवट वास्तूमध्ये आणले गेले. परंतु याठिकाणी परवानाधारक सर्वच कोळी भगिनींची जागा उपलब्ध नसल्याने अर्ध्याच कोळी भगिनींना याठिकाणी बसता येते. परिणामी निम्म्या कोळी भगिनींना मार्केटमध्ये बसण्याचीच जागा सल्याने त्याठिकाणी केवळ ५० कोळी भगिनींनाच बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


या मार्केटमधील कोळी भगिनींच्या म्हणण्यानुसार, पाच वर्षांपूर्वी पर्यायी जागेवरुन हटवून अर्धवट काम झालेल्या मंडईतील तळघरात अर्थात बेसमेंटमध्ये जागा दिली. तीसुध्दा निम्म्याच कोळणींना बसण्याची जागा दिली. या मार्केटमध्ये एकूण ११४ परवानाधारक कोळी भगिनी होत्या. पण आता त्यात बसण्याची जागा नसल्याने आणि काही कोळी भगिनी येत नाहीतर काहींना वयोमानानुसार बेसमेंटमध्ये टोपल्या घेवून जाणे शक्य नसल्याने त्यांनी येणे टाळले.


विशेष म्हणजे या मार्केटमध्ये सुरुवातील सीसी टिव्हीपासून सर्व सुविधा दिल्या होत्या, पण आता तिथे माशांकरता तसेच स्वच्छतागृहांसाठी पाण्याची सुविधा नाही. जर माशांवर शिंपडण्यासाठी पाणीच नसेल तर मासे कसे टिकणार असा सवाल करत कोळी भगिनींनी तेथील टॉयलेटसाठी पाणी नसल्याचीही खंत व्यक्त केली . तसेच ही जागा बेसमेंटमध्ये असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही, परिणामी मासे खरेदी करणाऱ्यांना या सांडपाण्यात उभे राहावे लागते,तसेच यामुळे उंदिर तसेच घुशींचा त्रासही सहन करावा लागतो. महापालिकेच्या मार्केट विभागाचा अधिकारी कधीही या मार्केटमध्ये येत नाही की कोळी भगिनींच्या तक्रारींची दखल घेत नाही. त्यामुळे नक्की मासळी बाजार हे कोळी भगिनींना व्यवसाय करण्यासाठी आहेत की त्यांचा बाजार उठवण्यासाठी आहे असा सवाल कोळी भगिनींकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२

महापौर, उपमहापौरांसह समित्यांच्या अध्यक्षांच्या सारथ्यासाठी वाहने सज्ज

महापौरांना इनोव्हा, तर समिती अध्यक्षांना भगव्या पट्यांच्या स्कॉर्पिओ सचिन धानजी मुंबई : मुंबईच्या महापौर तसेच

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात