गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा उड्डाणपूल अधिक आव्हानात्मक आहे. डॉ. हेडगेवार चौक येथे १२० मीटर लांबीचा पूल हा 'केबल स्टेड' स्वरुपाचा असून 'मुंबई मेट्रो - ४' च्या खालील पातळीवर म्हणजे पहिल्या स्तरावर प्रस्तावित आहे. मुख्‍य उड्डाणपूल प्रकल्पाचे एकूण तीन प्रमुख भाग आहेत. मुख्य उड्डाणपूल तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना तानसा जलवाहिनीवर उभारले जाणारे दोन छोटे उड्डाणपूल अशी विभागणी आहे. यापैकी उत्तर दिशेकडील तानसा जलवाहिनीवरील छोटा उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.



गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता हा मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या प्रकल अंतर्गत मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्ग आणि गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्ग यांना थेट जोडण्याची योजना आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. तिस-या टप्‍प्‍यातील भाग अ मध्‍ये मुलुंड (पश्चिम) खिंडिपाडा येथील गुरु गोविंद सिंग रस्‍त्‍यावरील उन्‍नत चक्रीय मार्ग व डॉ. हेडगेवार चौक येथे केबल स्‍टेड यांच्‍यासह उड्डाणुलाची संरचना व बांधकामे आदींचा समावेश आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुलुंड (पश्चिम) येथील सोनापूर जंक्‍शन येथे भेट देऊन उड्डाणपूल प्रगतीचा आढावा घेतला. तसेच, विविध निर्देश दिले. महानगरपालिका अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते.



गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत मुलुंड (पश्चिम) येथील खिंडिपाडा परिसरातील गुरु गोविंद सिंग मार्गावर उन्नत चक्रीय मार्गासह तसेच डॉ. हेडगेवार चौक येथे केबल - स्टेड संरचनेसह उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल दरम्यान सुमारे १.८९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून, संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीच्या दृष्टीने हा टप्पा अधिक आव्हानात्मक ठरत आहे. मुख्य उड्डाणपुलासाठी एकूण ४८ खांब प्रस्तावित असून त्यापैकी ३९ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तसेच उड्डाणपुलाच्या एकूण ४७ अंतरखंडांपैकी १० अंतरखंडांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच मुख्य उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तानसा जलवाहिनीवर दोन छोटे उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. ही सर्व कामे समांतरपणे पूर्ण करून मुलुंड भागातील गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाची संपूर्ण कामे १५ जून २०२७ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी

Nitesh Rane : मत्स्य शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी राज्यात 'क्लस्टर', मूल्यवर्धनासाठी कारखाना उभारण्यावरही चर्चा

मुंबई : राज्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक उद्योगाची जोड देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे