संत चोखामेळा

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा ॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा ॥
नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगे ॥
चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा ॥


- डॉ. देवीदास पोटे


संत चोखामेळा यांच्या खांद्यावर भागवत धर्माची पताका शोभून दिसते, असे म्हटले जाते. जातिभेदांच्या कृत्रिम भिंती पार करून जाणारा हा भाक्तिमार्ग त्यांनी आपल्या समर्पित भक्तिमय जगण्याने समृद्ध केला. तत्कालीन समाजरचनेने हीत ठरविलेल्या यातीत जन्मल्यामुळे येणारे दाहक वास्तव त्यांना अगतिकपणे सहन करावे लागले. सामाजिक विषमतेच्या जातीभेदाचे चटके त्यांना चांगलेच बसले. पण चोखामेळा यांचे मोठेपण असे, की त्यांनी या कटू अनुभवाचे भांडवल केले नाही. भक्तीच्या पावन प्रवाहात हे नकोसे, अप्रिय वास्तव त्यांनी विरघळवून टाकले.


कर्मकांडावर विश्वास ठेवणाऱ्या वरवरच्या बाह्य रूपाला भुलून खऱ्या आंतरिक अनुभूतील विसरणाऱ्या लोकांना त्यांनी आत्मविश्वासाने आणि निर्भयपणे बजावलं, " वरवरच्या रंग रूपाला का बरं भुललास? ऊस बाहेरून ओबडधोबड दिसतो पण त्यातला रस मात्र गोड असतो. धनुष्याची कमान वेडीवाकडी दिसते, पण बाण मात्र सरळ असतो. नदी वेडीवाकडी वळणे घेत डोगंरदऱ्यातून वाहते, पण तिचा गाळ मात्र स्वच्छ असतो. संत चोखामेळा स्वत:विषयी म्हणतात, 'हा चोखामेळा जरी असा ओबडधोबड दिसत असला तरी त्याचा अंतरीचा भक्तिभाव मात्र अंतर्बाह्य शुद्ध आहे.' हेच तत्त्व सांगताना संत एकनाथ म्हणतात, 'तीर्थस्थाने अंग जरी शुद्ध केले । नाही धोवियले अंतरास ॥. आयुष्यात अर निर्मळता वा अंतरीची सात्विकता नसेल, तर साबणाने शरीराच्या वरवरच्या रूपाला किती सुंदर केले, सजवले तरी अंतरीचा शुद्ध भाव नसेल तर काय उपयोग आहे?


आजच्या वर्तमानकाळात तर वरवरच्या या सजावटीला आणि रंगरंगोटील अनाठायी महत्त्व आले आहे. लोक वरवरच्या देखाव्याला भुलून काल्पनिक भुलभूलैयात अडकत आहेत.


संत चोखामेळा यांनी सातशे वर्षांपूर्वी आयुष्यातले निखळ सत्य सांगितले आहे. मानवी आयुष्यात ते कुठल्याही काळात लागू पडते.

Comments
Add Comment

प्रारब्ध ते पाप- पुण्य

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै मी या आधी श्रीमंत माणसाचे उदाहरण दिले. आता दुसरे उदाहरण घेऊ, ‘सत्ता’.

दवबिंदूतून झिरपणारा प्रकाश

ऋतुराज-ऋतुजा केळकर काळच्या दवबिंदूतून झिरपणारा सूर्यकिरण जसा पाण्याच्या थेंबात चमकतो, तसा आत्मा हा

वेळेचा अपव्यय

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत मौल्यवान संपत्ती कोणती, असा प्रश्न विचारला तर बहुतांश

कहत कबीर सुनो भाई साधो...

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी अत्यंत शुभ असा ब्रह्ममुहूर्ताचा समय होता. रात्रीच्या काळोखालाच जणू स्वतःला

संचिताचा जीवनावर प्रभाव

आपल्या प्रबोधनाचा विषय म्हणजेच "अंधारातून प्रकाशाकडे" हा पाहताना, आपण इतरही काही महत्त्वाचे विषय समजावून

ईश्वराचे अस्तित्व

मानवजातीच्या इतिहासात “ईश्वर आहे का?” हा प्रश्न केवळ धार्मिक नसून तत्त्वज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र आणि