मानवी संस्कृती

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आज जगात जे काही चाललेले आहे ते सर्वकाही संस्कारांमुळे चाललेले आहे. अनिष्ट चाललेले आहे ते व चांगले चाललेले आहे तेसुद्धा. सर्व काही संस्कारांमुळेच चाललेले आहे. म्हणूनच मूल जन्माला आल्यावर, त्याच्यावर चांगले संस्कार कसे होतील ह्याची काळजी घेणे हे त्या कुटुंबातील माणसांचे काम आहे. माणसाला बुद्धी दिलेली आहे ती पुढील पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी! सुसंस्कार म्हणजे काय? चांगल्या संस्कृतीतून केले गेलेले संस्कार. चांगली संस्कृती म्हणजे काय? मानवी संस्कृतीचे संस्कार! आज जे कुसंस्कार होतात त्यातून माणसाच्या बुद्धीची जडणघडण संकुचित होण्याच्या दृष्टीने होते. बुद्धीला योग्य स्वातंत्र्य मिळत नाही व त्यामुळे त्याचे विचार, उच्चार व आचार त्याप्रमाणे होतात. आज जगांत युद्धलढाया, भांडणतंटे, खूनमारी होतात म्हणून मानवी संस्कृती महत्वाची आहे. मानवी संस्कृती कुठली? समता, सभ्यता. सामंजस्य, सहिष्णुता व समाधान हे मानवी संस्कृतीचे पंचशील आहे. ह्या मानवी संस्कृतीच्या आधारे जे संस्कार होतात,त्याने खरा माणूस तयार होईल. आज माणसाला माणूस का म्हणायचे ? तर ह्याला दोन पाय आहेत म्हणून ? पशु व माणूस ह्यांत फरक नाही कारण ते जसे करतात तसे माणूस करतो. बरेचदा पशुपेक्षासुद्धा माणूस अधिक वाईट वागतो. म्हणून मानवी संस्कृती महत्वाची आहे.


मूल जन्माला येते तेव्हा संचित घेऊन येते. त्यातून नैसर्गिक पद्धतीने प्रारब्ध वाट्याला येते. मग मागल्या जन्माचे आठवत का नाही ? ह्याला एकच कारण. तो व्यवस्थेचा भाग आहे. मी व्याख्या केलेली आहे "नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर!" आधीचा जन्म आठवत नाही हा व्यवस्थेचा भाग आहे. आधीचा जन्म आठवला असता तर ती व्यवस्था राहिली नसती. मागचा जन्म आठवला असता तर गोंधळ झाला असता. दुःख अडचणी यापेक्षा दुसरे काय वाट्याला येईल ! हे आठवत नाही हा दिव्य व्यवस्थेचा भाग आहे. तुम्हाला जर मागचा जन्म आठवू लागला तर हाहाकार होईल. नवऱ्याला मागच्या जन्मीची बायको व बायकोला मागच्या जन्मीचा नवरा आठवत नाही हा व्यवस्थेचा भाग आहे. ह्या व्यवस्थेला अनुसरून जीवन जगणे म्हणजे उपासना. ह्या व्यवस्थेला धक्का लागता कामा नये. तुम्ही जर ह्या व्यवस्थेला अनुसरून जीवन जगलात तर परमानंद होईल व ह्या व्यवस्थेला अनुसरून जीवन जगला नाहीतर दुःख होईल. घरांत जर अव्यवस्था असेल तर घरांत बोंबाबोंब. फणी मिळत नाही. घड्या0 मिळत नाही व त्यासाठी आरडा ओरडा. असा माणूस बाहेर पडताना आसपासच्या सर्व लोकांना कळते.हा बाहेर निघाला.काही लोक सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवतो. घड्याळाच्या जागेवार घड्याळ. फणीच्या जागेवर फणी. वस्तू जगाच्या जागेवर असल्या की तुम्ही वेळेवर निघता. गाडी वेळेवर मिळते. म्हणून परमेश्वरी व्यवस्था व मानवी व्यवस्था ह्यांत मानवी व्यवस्था म्हणजे उपासना व नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर !

Comments
Add Comment

संचिताचा जीवनावर प्रभाव

आपल्या प्रबोधनाचा विषय म्हणजेच "अंधारातून प्रकाशाकडे" हा पाहताना, आपण इतरही काही महत्त्वाचे विषय समजावून

ईश्वराचे अस्तित्व

मानवजातीच्या इतिहासात “ईश्वर आहे का?” हा प्रश्न केवळ धार्मिक नसून तत्त्वज्ञान, विज्ञान, मानसशास्त्र आणि

विठूची पुरणपोळी भक्तीचा उत्सव

"शिखरशिंगणापुरची आख्यायिका जुनी..." "विठ्ठलाला पुरणपोळी अर्पणाची धुनी..." "वाद नको नियमांचा, भावच खरी

“हरि बोल...!’’

काझीसाब, आज आपला सारा गावच पागल झालाय, असे वाटतेय. प्रत्येकाच्या तोंडून फक्त एकच शब्द येतोय.. “हरि बोल... हरि

संत नामदेव

बाप कवणाचा माय कवणाची बाप कवणाचा माय कवणाची । सोयरी धायरी तेही कवणाची ॥ द्रव्य संपत्ती देखती तंवचि मानिती

आत्मशांती

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि गोंधळलेल्या जगात ‘शांती’ हा शब्द जरी सहज