अजित पवारांचा अपघात झालेल्या 'व्हीएसआर व्हेंचर' विमान कंपनीचे ऑडिट करा; 'डीजीसीए'चे आदेश

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेच्या तपासाला गती देण्यात आली असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने संबंधित विमान कंपनीविरोधात कठोर पावले उचलली आहेत. अजित पवार ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते, त्या 'व्हीएसआर व्हेंचर' कंपनीचे सखोल ऑडिट करण्याचे आदेश डीजीसीएने दिले असून, त्याचा अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


अपघातग्रस्त 'लिअरजेट ४५ एक्सआर' (मालक - व्हीएसआर व्हेंचर) विमानाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने विशेष पथक नेमले आहे. या ऑडिटअंतर्गत कंपनीचे रोजचे कामकाज, वैमानिकांचे लॉगबुक, तसेच विमानांच्या देखभाल आणि तांत्रिक तपासणीशी संबंधित कागदपत्रांची कसून छाननी केली जाणार आहे. विमानांची नियमित तपासणी होत होती का आणि नोंदी अचूक व पारदर्शक पद्धतीने ठेवण्यात आल्या होत्या का, याची विशेष तपासणी केली जाणार आहे.


अजित पवार हे २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी विमानाने मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगचा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंग करत असताना विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अपघातामागील कारणांचा सखोल तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



कंपनीचा इतिहास वादग्रस्त


 

या अपघाताच्या तांत्रिक आणि वातावरणीय कारणांचा शोध 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' घेत असून, त्याच वेळी डीजीसीएने कंपनीच्या एकूण कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित करत विशेष ऑडिट सुरू केले आहे. चौकशीदरम्यान 'व्हीएसआर व्हेंचर' कंपनीचा वादग्रस्त इतिहासही समोर आला आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने यापूर्वीच या कंपनीच्या विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेशास मनाई केली होती. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये याच कंपनीच्या ‘व्हिटी-डीबीएल’ या विमानाचा मुंबईत अपघात झाला होता. त्या प्रकरणात विचारलेल्या प्रश्नांना कंपनी समाधानकारक उत्तरे देऊ शकली नव्हती. दरम्यान, माहिती देण्यास टाळाटाळ केल्याच्या पार्श्वभूमीवर १७ डिसेंबर २०२४ रोजी युरोपियन एजन्सीने कंपनीचे 'थर्ड कंट्री ऑपरेटर' प्रमाणपत्र रद्द केले होते. मात्र, हे प्रमाणपत्र एका वर्षानंतर पुन्हा बहाल करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे