IND vs PAK : पाकिस्तानचा भारत सोबत न खेळण्याचा निर्णय; आयसीसी करणार कडक कारवाई

टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या गट फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा भारताशी सामना होणार होता. मात्र आयसीसीने म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढल्यानंतर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.


आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:


पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.


आयसीसीची भूमिका:


आयसीसीने रविवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, जरी राष्ट्रीय धोरणांमध्ये सरकारची भूमिका असते हे मान्य असलं, तरी अशा निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठा फटका बसू शकतो. पीसीबीने आपल्या निर्णयाचे देशांतर्गत क्रिकेटवर होणारे दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम लक्षात घ्यायला हवेत.या निर्णयामुळे जागतिक क्रिकेट इकोसिस्टमवर परिणाम होऊ शकतो, ज्याचा पीसीबी स्वतः एक सदस्य आणि लाभार्थी देखील आहे. आयसीसीने पीसीबीकडे पुन्हा एकदा निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. सर्व पक्षांना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी परिषद तयार असल्याचंही आयसीसीने स्पष्ट केलं आहे.


पीसीबीविरुद्ध पुढीलपैकी एक किंवा अधिक धक्कादायक अॅक्शन घेतल्या जाऊ शकतात 


- पाकिस्तानला संपूर्ण टी-२० वर्ल्ड कपमधूनच बाहेर काढले जाऊ शकते.
- आयसीसीकडून पाकिस्तानला मिळणारा वार्षिक महसूल (सुमारे ३५० कोटी रुपये) रोखला जाऊ शकतो.
- भारत-पाक सामना रद्द झाल्यामुळे ब्रॉडकास्टर जिओ-हॉटस्टारला होणाऱ्या नुकसानीची (सुमारे २०० कोटी रुपये) भरपाई PCB कडून वसूल केली जाऊ शकते.
- पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये विदेशी खेळाडूंना सहभागी होण्यास बंदी घातली जाऊ शकते.


सुमारे २०० कोटींचे नुकसान:


जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना झाला नाही तर जाहिरात, तिकीट विक्री आणि प्रसारण हक्कांमधून मिळणारे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान होईल. हे दोन्ही देशांसाठी एक मोठे आर्थिक नुकसान आहे. भारत हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, मात्र पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नाही. हे पैसे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. पाकिस्तानला दरवर्षी अंदाजे २८५ कोटी रुपये ($३४.५१ दशलक्ष) मिळतात. परंतु हे पैसे फक्त तेव्हाच मिळू शकतात जेव्हा पाकिस्तान बोर्डाकडून सर्व नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे भारतासोबतचा सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानला महागात पडणार आहे.

Comments
Add Comment

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

RR : राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील